गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग रखडला आहे. गेल्या १३-१४ वर्षांपासून सातत्याने प्रत्येक हिवाळी, पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई गोवा महामार्ग प्रकल्पाविषयी प्रश्न उपस्थित केले जातात. प्रत्येकवेळी या प्रश्नाची उत्तरे दिली जातात. पण हा प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. नेहमीप्रमाणे येतो पावसाळा या युक्तीप्रमाणे नेहमीप्रमाणे येतो हा प्रश्न यानुसार या प्रश्नाची तीच तीच उत्तरे दिली जातात. सध्या विधिमंडळात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. महायुती सरकारचं या सत्तेतील हे शेवटचं अधिवशेन आहे. त्यामुळे सरकारची मुदत संपण्याआधी तरी हा महामार्ग पूर्ण व्हावा अशी मागणी केली जातेय. यासंदर्भात आज आमदार विक्रम काळे आणि आमदार सतिश चव्हाण यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या प्रश्नाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा