“ज्यावेळी महाराष्ट्रात गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबार, पालघर साधू हत्याकांड झालं त्यावेळेस कुठं होतं सरकार? तेव्हा का नाही केलात बंद? हा केवळ चौकश्यांवरुन महाराष्ट्राचे लक्ष विचलित करण्याचा नियोजित कार्यक्रम आहे.” असा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर केला आहे.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकासआघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. या बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हा बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर देखील उतरल्याचे दिसून येत आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
pune rto
“पुणेकर फक्त एकाच गोष्टीला घाबरतात, बाकी कोणालाच नाही!” पण कोणती आहे ती गोष्ट, पाहा Viral Video
veer pahariya first reaction after marathi comedian pranit more assaulted
“कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा…”, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनवरील हल्ल्याबाबत वीर पहारियाचं स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं?
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”

याबाबत बोलातना प्रवीण दरेकर म्हणाले, “ज्यावेळी नागपुरला गोवारी हत्याकांड झालं, त्यावेळी सरकार कोणाचं होतं? त्यावेळी संप केला का? मावळला ज्यावेळी भयानक क्रूर पद्धतीने पोलिसी बळाचा वापर करून गोळीबार शेतकऱ्यांवर केला, त्यावेळा आपल्या संवेदना भावना कुठं होत्या? पालघरला साधुंचं हत्याकांड झालं, त्यावेळी दोन शब्दांचा आपण त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला नाही, संप केला नाही, त्यावेळी आपल्या संवेदना कुठं होत्या? टीव्ही -9 शी ते बोलत होते.

पीक विमा मिळत नसल्याने शेतकरी टाहो फोडतोय –

तसेच, “आज महाराष्ट्र पूर्णपणे अतिवृष्टीने उध्वस्त झालेला आहे. तौक्ते वादाळाने कोकणात तर, नंतर पश्चिम महाराष्ट्रात नुकसान झाल्यानंतर मागील पंधरा दिवसापासून विदर्भ, मराठवाडा संपूर्णपणे उजाड झाला आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्या शेतकऱ्याला आधआर देण्यासाठी मुख्यमंत्री सोडाच, साधे पालकमंत्री तरी गेले आहेत का? एक रुपयाची मदत देखील त्या उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला केलेली नाही. त्याला पीक विमा मिळत नसल्याने तो टाहो फोडतोय, त्याच्या पिण्याच्या पाण्यासह शेत पंपाचं कनेक्शन आपण कापत आहात, कर्जाबाजारी शेतकरी झाला आहे.” असंही यावेळी दरेकर यांनी बोलून दाखवलं.

जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी हा नियोजित कार्यक्रम –

याचबरोबर, “खरच जर शेतकऱ्यांबद्दल आपल्याला संवेदना असती, तर शेतकऱ्याला आधार दिला असता. परंतु, शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण तुम्हाला करायचं आहे आणि तो शेतकऱ्याचा आक्रोश, तो शेतकऱ्याचा संताप आज महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भामध्ये दिसतोय. त्यामधून सरकारबद्दल जे काही नकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे. विविध प्रकारच्या चौकशा महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. या सगळ्या गोष्टींपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी हा नियोजित कार्यक्रम आहे.” असा आरोप दरेकर यांनी यावेळी महाविकासआघाडीवर केला.

पब्लिक है ये सब जानती है… –

“महाराष्ट्रात आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांना कधी कॅबिनेटमध्ये श्रद्धांजली अपर्ण केली आहे का? आज महिलांवर भयानक अत्याचार सुरू आहेत, त्याबद्दल संवदेना व्यक्त केल्या का? लखीमपूरला घटना झाला ती दुर्दैवीच आहे, पण तिचं राजकारण इथं करायचं, हे महाराष्ट्रातील जनतेला, शेतकऱ्यांना समजत नाही असं तुम्हाला वाटत असेल, तर पब्लिक सब जानती है… खरं काय खोटं काय.. जनतेने जिल्हापरिषद निवडणुकीत दाखवून दिलं आहे. ” असं दरेकर यांना यावेळी सांगितलं.

Story img Loader