ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील खरा मुख्यमंत्री कोण आहे? असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. दरम्यान, त्यांनी मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवरूनही सरकारला खडेबोल सुनावले.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मागील दोन आठवड्यांपासून मी सतत मुंबई-नाशिक महामार्गाचा विषय लावून धरला आहे. सध्या काही मंत्री ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने प्रवास करत आहेत. मुंबई-नाशिक रस्ता खराब झाल्यामुळेच संबंधित मंत्री ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने प्रवास करत आहेत.”

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “…अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार”, आदित्य ठाकरेंचा इशारा; मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरही टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Raj Thackeray should come to Sangamner to see why Balasaheb Thorat was defeated says MLA Amol Khatal
माजी मंत्री थोरात यांचा पराभव का झाला ते पाहण्यासाठी राज ठाकरेंनी संगमनेरात यावे – आमदार अमोल खताळ
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”

“मुंबई-गोवा या रस्त्याचंही गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. या रस्त्यावर अनेक खड्डे आहेत. या प्रश्नावरून अनेकजण आंदोलन करतायत. संसदेतही हा मुद्दा उचलून धरला जात आहे. पण सरकारमधील नेत्यांना फक्त पालकमंत्री कोण बनणार? यावरून भांडणं करायला वेळ आहे,” असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

“हा महामार्ग नॅशनल हायवेज ऑथोरिटी ऑफ इंडियाकडे (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) म्हणजेच केंद्र सरकारच्या अधिकारांमध्ये येतो. त्यामुळे हा महामार्ग महाराष्ट्रातून जातो म्हणून एवढे खड्डे पाडून ठेवले आहेत का? म्हणून या रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाहीये का? असा प्रश्न पडतो. आपण ऐकतो की, एनएचएआय एका तासांत हजारो किलोमीटरचे रस्ते बनवतो. उद्या ते येथून चंद्रापर्यंत पण रस्ते बनवतील. पण आज त्यांनी महाराष्ट्राला चंद्राचे रस्ते दिले आहेत. यावर कुणीच बोलत नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्रावर अन्याय होत आहे”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Story img Loader