“भाजपाकडून जी परिस्थिती शिवसेनेची करण्याचा प्रयत्न झाला, तशीच स्थिती अजित पवार मित्रमंडळ व एकनाथ शिंदे गटाची होईल, अशी चर्चा लोकांमध्ये चालू आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पवार म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना चारही राज्यांच्या निकालाबाबत भाष्य केलं. तसंच, भाजपाचा उल्लेख करत राज्यातील राजकीय परिस्थितीवरही टिप्पणी केली. रोहित पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते?

“भाजपाकडून जी परिस्थिती शिवसेनेची करण्याचा प्रयत्न झाला, तशीच स्थिती अजित पवार मित्रमंडळ व एकनाथ शिंदे गटाची होईल, अशी चर्चा लोकांमध्ये चालू आहे. सगळ्यांनीच याची दक्षता घेतली पाहिजे. भाजपाला लोकनेते चालत नाहीत. लोकांमधले पक्ष चालत नाहीत. भाजपाबरोबर जाणारे पक्ष किंवा नेत्यांना हळूहळू राजकीय जीवनातून संपवलं जातं”, असा गंभीर दावा रोहित पवार यांनी केला.

Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Prakash Ambedkar slams Manoj Jarange Patil
Prakash Ambedkar: “मनोज जरांगे पाटील यांनीच भाजपाला…”, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा आरोप; म्हणाले…
What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप
Santosh Deshmukh family expresses expectations from Ajit Pawar for justice
“अजितदादांनी प्रथम न्याय देण्याचे कार्य करावे,” संतोष देशमुख कुटुंबीयांची अपेक्षा

हेही वाचा >> “…तशीच स्थिती अजित पवार मित्रमंडळ व शिंदे गटाची होईल”, रोहित पवारांचा टोला; भाजपाचा उल्लेख करत म्हणाले…

अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर काय?

“रोहित पवार अजित दादांवर आज ज्या पद्धतीने टीका करताहेत त्यांनी एकदा प्रामाणिकपणे जनतेला उत्तर द्यावं, भाजपसोबत जाण्याची पहिली भूमिका YB चव्हाण सेंटरला पवार साहेबांसमोर कशाला मांडली? मतदारसंघात निधी कमी पडतोय, भाजपसोबत जावे लागेल हे वाक्य कोणाचे होते? आता हा तळतळाट कशासाठी?” असं अमोल मिटकरी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालात तीन राज्यांमध्ये भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही मोदींचाच वरचष्मा राहिल असं सत्ताधारी म्हणत आहेत. तसंच, विरोधकांकडून भाजपावर टीका केली जात आहे.

Story img Loader