राज्याच्या राजकारणामध्ये सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय असणाऱ्या मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आज गृह खात्याने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बैठकीतील चर्चेबद्दलची माहिती दिली. मात्र या पत्रकार परिषदेला राज्याचे पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. आधी आदित्य ठाकरेंना या मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. मात्र आदित्य ठाकरे या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला गृहमंत्र्यांसोबत उपस्थित राहण्यामागे एक विशेष कारण होतं. याबद्दल बोलताना दिलीप वळसे पाटलांनीच कल्पना देत आदित्य यांना भूमिका मांडण्यास सांगितलं.
नक्की वाचा >> मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात बोलताना गृहमंत्री गावांतील भजनं, किर्तनांसहीत नवरात्री, गणेशोत्सवाचाही उल्लेख करत म्हणाले, “सर्वांना…”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा