पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल समोर येताच देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरीही सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसंच, आगामी लोकसभा निवडणूक ही एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी रंगणार आहे. त्यामुळे या दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाचा मोठा तिढा आहे. अनेक पक्ष एकत्र आल्याने राज्या-राज्यांत जागा वाटप करताना सर्वच पक्षांना काही जागांचा त्याग करावा लागणार आहे. तसंच, मतविभाजन टाळण्यासाठी स्थानिक पक्षांनाही हाताशी घ्यावं लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीही इंडिया आघाडीत सामिल होण्यास इच्छुक आहे. परंतु, काँग्रेसबरोबर असलेल्या वैचारिक मतभेदांमुळे हे गणित जुळत नसल्याचं दिसतंय. परंतु, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

जागा वाटप विसरून सगळ्यांनी मोदींविरोधात एकत्र यायला हवं, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल (२५ डिसेंबर) नागपुरात आवाहन केलं. त्यांच्या या आवाहनामुळे तेही इंडिया आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. वंचितने महाराष्ट्रात ठाकरे गटाबरोबर सख्य जमवलं असलं तरीही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत त्यांना अधिकृत स्थान मिळालेलं नाही. याबाबत चर्चा होणार असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितलं. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

delhi assembly election 2025
लालकिल्ला : भाजपसाठी वर्ग ठरला ‘धर्म’!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
loksatta editorial on arvind kejriwal
अग्रलेख : ‘आप’ले मरण पाहिले…
India alliance
“इंडिया आघाडी अबाधित, पुढच्या लोकसभा निवडणुकीत…”, दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेस नेत्याचं विधान चर्चेत
Shiv Sena minister reacts to the NCP's failure in Delhi elections, questioning the possibility of their success so soon.
“राष्ट्रवादी एवढ्या लवकर यशस्वी होईल हे स्वप्न पाहणेही…”, दिल्लीच्या निकालानंतर शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे विधान
Mohan Singh Bisht
Mohan Singh Bisht: मुस्लिमबहुल मुस्तफाबादमधून विजयी होणारे भाजपा नेते मोहन सिंह बिश्त कोण आहेत?
कोण आहेत प्रताप सरनाईक; मुख्यमंत्र्यांनी शिवसेना शिंदे गटाचे पंख छाटले का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी? कोण आहेत प्रताप सरनाईक?
AAP leaders discussing strategies while expressing confidence about winning in Delhi, leaving room for collaboration with Congress.
“दिल्ली जिंकण्याचा आत्मविश्वास”, तरीही आम आदमी पक्ष काँग्रेसच्या संपर्कात का?

हेही वाचा >> “…तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाहीत”, प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला टोला

“आघाडीसंदर्भातील निर्णय घेण्याकरता काँग्रसेने समिती स्थापन केली आहे. या समितीत सर्व राज्यनिहाय आघाडी अपेक्षित आहे. त्यावर २९ डिसेंबरपासून चर्चा होणार आहे. आमची सकारात्मक भूमिका आहे. माझी व्यक्तिगत भूमिका निश्चित राहणार आहे की वंचितने प्रतिसाद दिला तर त्यांनाही आघाडीत घेतलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांनी सकारात्मक भूमिका घेतली तर मला खात्री आहे की महाराष्ट्रात मतांचं विभाजन टाळता येईल. भाजपाविरोधात सक्षम पर्याय महाविकास आघाडी, प्रकाश आंबेडकर आणि इतर समविचारी पक्ष ठरू शकतो. त्यामुळे जागा वाटपात त्यांना (वंचितला) सामावून घेता येऊ शकतं, असं माझं मत आहे”, असं अशोक चव्हाण म्हणाले.

हेही वाचा >> मानगुटीवरील ‘भूत’ उतरविण्यास प्राधान्य द्या; प्रकाश आंबेडकर यांचा ‘इंडिया’ आघाडीला सल्ला

“काँग्रेस अखिल भारतीय समितीची २९ डिसेंबरला जागा वाटसंदर्भात बैठक होईल. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात धोरण ठरवलं जाईल. ही पक्षनिहाय बैठक असेल. प्रत्येक पक्षाला चर्चेसाठी बोलावून त्यांची मते लक्षात घेऊन अंतिम स्वरुप करता येईल”, असंही अशोक चव्हाण म्हणाले.

Story img Loader