गेल्या ४ डिसेंबरला गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत नक्षलवादी नेता नर्मदाक्का व भास्कर यांच्यासह सहा नक्षलवादी ठार झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांच्या या मृत्यूला महाराष्ट्र, तसेच छत्तीसगड पोलिसांनी दुजोरा दिला आहे, तर नक्षलवाद्यांनी मात्र मौन बाळगले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेली नर्मदा मूळची आंध्रप्रदेशातील असून गेल्या ३० वर्षांंपासून सक्रीय व या चळवळीची संस्थापक सदस्य होती. मृत्यूसमयी ती ६० वर्षांंची होती. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीची सदस्य असलेली नर्मदा गेल्या काही वर्षांंपासून दक्षिण गडचिरोलीत वास्तव्याला होती. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेली नर्मदा मूळची आंध्रप्रदेशातील असून ती या चळवळीची संस्थापक सदस्य होती. दक्षिण गडचिरोलीत सक्रीय असलेल्या शेखरच्या आत्मसमर्पणानंतर भास्करने या भागाचा विभागीय सचिव म्हणून नुकतीच जबाबदारी सांभाळली होती. चळवळीतील दोन बडे नेते, अशी या दोघांची ओळख होती. आता हे दोघेही ठार झाल्याला महाराष्ट्र व छत्तीसगडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, तसेच गुप्तचर यंत्रणांनीही दुजोरा दिला आहे. सी-६० च्या जवानांचे हे मोठे यश मानले जात असले तरी या घटनेमुळे हादरलेल्या नक्षलवाद्यांनी मात्र अद्याप मौनच पत्करलेले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा