झी मराठी वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिलं आहे. या मालिकेतून समाज प्रबोधनाचा कोणताही संदेश नाही, उलट महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा त्यांचा ध्यास आहे, असा आरोप प्रदीप नाईक यांनी केला आहे.

‘या मालिकेत २० वर्षांची मुलगी ४० वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचं दाखवलं आहे. मात्र हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्रासाठी घातक आहे. या मालिकेतून आमच्या माता-भगिनींना वेगळा संदेश देण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत आम्ही संबंधित वाहिनीकडे फोनवरुन तक्रार दिली, मात्र ई- मेल करण्यास बजावून आम्हाला धुडकावून लावले. या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला धक्का पोहोचवला जात आहे. या मालिकेतील दिग्दर्शक, निर्माते किंवा अभिनेते आपल्या घरातील २० वर्षीय मुलीचे लग्न ४० वर्षीय युवकाशी लावून देतील का? त्यामुळे या मालिकेत बदल करावा अन्यथा बंद करावी,’ असं प्रदीप नाईक यांनी निवेदनात म्हटलं आहे.

MPSC Verdict on confusion in Clerk Typist exam Nagpur
एमपीएससी: लिपिक-टंकलेखक परीक्षेतील गोंधळाबाबत मोठा निर्णय; ‘या’ उमेदवारांना कारवाईचा इशारा
Bhavesh Bhinde arrested
मोठी बातमी! घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक; उदयपूरमधून पोलिसांनी घेतले ताब्यात
nashik, External Affairs Minister, S Jaishankar, External Affairs Minister S Jaishankar, Maharashtra s Role in Food Grain, Trade Routes, Foreign Policy Differences,
व्यापारी मार्ग उभारणीनंतर कृषिमाल पुरविण्यात महाराष्ट्राची भूमिका महत्वपूर्ण, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
Sangli, Order, structural audit,
सांगली : होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश
Lieutenant General Pawan Chadha took information about Agniveer
नागपूर : लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा यांनी घेतली ‘अग्निवीर’बद्दल माहिती
narendra modi nashik rally
“राज्यातील नेते फुसका बार, तर पंतप्रधान मोदी…”; नाशिकमधील सभेपूर्वी कांदा उत्पादकांना नोटीस देण्यावरून रोहित पवारांचं टीकास्र!
mumbai water supply marathi news, mumbai east west suburban marathi news
मुंबई: उपनगरवासीयांचे पाणी बंद ? पूर्व-पश्चिम उपनगरांतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर
Taluka Superintendents, Taluka Superintendents Empowered to Sign Cm Medical Assistance Fund, decision was taken in a meeting in Kolhapur, Kolhapur news, cm medical assisatance fund, cm medical assistance fund news, Taluka Superintendents cm medical assistance, marathi news,
मुख्यमंत्री वैद्यकीय अर्जावर तालुका अधीक्षकांच्या स्वाक्षरीची अंमलबजावणी होणार; ग्रामीण रुग्णांना दिलासा

या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार प्रमुख भूमिकेत आहेत. सुबोध विक्रांत सरंजामे या श्रीमंत व्यावसायिकाची तर गायत्री ईशा निमकर या मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणीची भूमिका साकारत आहे. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली असून टीआरपीच्या यादीतही आघाडीवर आहे.