अखेर अभिषेक बच्चनने आपली पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांच्यासोबत थोडे निवांत क्षण घालवण्याचा निर्णय घेतला आहे. ऐश्वर्या आणि आराध्याचा झोपाळ्यावर बसलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यापासून तो स्वतःला रोखू शकला नाही. ‘आनंद’ एवढाच मेसेज त्याने या फोटोला लिहिला आहे. पण त्याच्या या मेसेजमधूनच त्याच्या अनेक भावना दिसून येतात. ऐश्वर्या आणि अभिषेक दोघंही आपल्या कामांमध्ये व्यग्र असल्यामुळे एकत्रित असा वेळ काढू शकत नाहीत. जेव्हा आराध्यासोबत ऐश्वर्या कान महोत्सवाला गेली होती तेव्हा अभिषेकला या दोघींची फार आठवण येत होती. याशिवाय ऐश्वर्याच्या वडिलांच्या निधनामुळे दोघांनी आपल्या लग्नाचा वाढदिवसही साजरा केला नाही.

https://www.instagram.com/p/BVpwCebhJi-/

काही दिवसांपूर्वी अभिषेकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले होते. त्यातील एका फोटोमध्ये तो आपल्या बाबांना म्हणजे अमिताभ यांना मिठी मारताना दिसलाय. त्याच्या मिठीत बिग बीही आनंदून गेल्याचं दिसतंय. तर दुसऱ्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात बघायला गेलेला अभिषेक आणि त्याची भावंड दिसत आहेत. कुली सिनेमावेळी झालेल्या अपघाताच्या वेळचा हा फोटो आहे. तेव्हा अभिषेक लहान असल्यामुळे आपल्या बाबांना नक्की काय झाले आहे याची त्याला कल्पना नव्हती.

https://www.instagram.com/p/BVEX_whhSfq/

https://www.instagram.com/p/BUyEtoah8L9/

दरम्यान, रुपेरी पडद्यापासून जवळपास सात महिने दूर राहिल्यानंतर बॉलिवूडची सौंदर्यवर्ती ऐश्वर्या राय बच्चन लवकरच नव्या सिनेमात दिसणार आहे. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी ‘फॅनी खान’ या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसेल. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने महत्त्वपूर्ण भूमिका करण्याकडे प्राधान्य दिले होते. तिने ‘जझ्बा’, ‘सरबजीत’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’सारख्या सिनेमांमध्ये तिच्या अभिनयाची चुणूक पुन्हा दाखवून दिली. ‘जझ्बा’ आणि ‘सरबजीत’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कमाई करण्यात अयशस्वी ठरले तरी यातील ऐश्वर्याच्या कामाची आणि तिने स्वीकारलेल्या भूमिकांची सर्व स्तरातून प्रशंसा करण्यात आली होती.

https://www.instagram.com/p/BUWAfzhhNH7/