क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या खेळीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम आणि हार्दिकच्या अफेअरबाबत बऱ्याच चर्चा रंगल्या. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. मात्र या दोघांमध्ये आता दुरावा निर्माण झाला असून त्यांच्या ब्रेकअपचं कारण ठरली आहे अभिनेत्री ईशा गुप्ता.

‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार हार्दिकसोबतच्या रिलेशनशिपबाबत एली फार गंभीर होती. मात्र त्या तुलनेत हार्दिकने तिला फार महत्त्व दिलं नाही. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि ब्रेकअपचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता हार्दिकचं नाव ईशासोबत जोडलं जात आहे.
एका पार्टीमध्ये ईशा आणि हार्दिकची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्येही जवळीक निर्माण झाली असून ते नियमितपणे एकमेकांशी बोलू लागले. इतकंच नाही तर ते डेट करत असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

https://www.instagram.com/p/BjpP-pjgkxY/

https://www.instagram.com/p/BjobXFeAGOJ/

वाचा : ‘स्टार प्रवाह’वर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा

सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करणारी ईशासुद्धा नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. बिनधास्त स्वभाव आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी ईशा फॅशन डिझायनर निखिल थंपीसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र नंतर ईशाने या वृत्ताला नकार दिला. तर दुसरीकडे एली आणि हार्दिकला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये, पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं.