मागील दोन दिवसांपासून गाजत असलेल्या भीमा- कोरेगाव हिंसा प्रकरणानंतर दलित संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचे राज्यभर पडसाद पहायला मिळाले.. मुंबई- ठाण्यासहीत राज्यातील अनेक भागांमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरलेले दिसले. हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी या आंदोलनामुळे अनेकांना नुकसान सहन करावे लागले. या आंदोलनाची झळ बॉलिवूडलाही पोहोचली. आधीच ठरलेले नियोजन डरमळल्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर याबद्दल नाराजी व्यक्त केली.
बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि गायकांनी महाराष्ट्र बंदचा विरोध केला. राहुल ढोलकिया, अनुभव सिन्हा, पुलकित सम्राट आणि विशाल दादलानीसह अनेक कलाकारांनी ट्विटरवर त्यांचे विचार मांडले. ‘सोनी के टीटू की स्विटी’ आणि संजय सूरीच्या सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
https://twitter.com/ashokepandit/status/948452427967102976
महाराष्ट्र बंदचा विरोध करताना अशोक पंडित म्हणाले की, ‘हिंसेला घाबरून लोक कामावर गेले नाहीत. कामगारांच्या अनुपस्थितीमुळे फिल्मसिटी आणि दुसऱ्या ठिकाणी सिनेमे आणि मालिकांचे चित्रीकरण बंद पडले… हे फार दुःखद आहे.’
I don't know how to explain to younger ones what happened in #Maharashtra today. What should I tell them so they understand? They want to know.
— Anubhav Sinha (@anubhavsinha) January 2, 2018
अनुभव सिन्हानेही या घटनेची निंदा करत म्हटले की, ‘आज महाराष्ट्रात काय घडलं हे मी लहान मुलांना कसं समजावून सांगू हेच कळत नाहीये. लहान मुलांना जाणून घ्यायची इच्छा आहे.. पण त्यांना समजावण्यासाठी मला काय बोलायला हवे…’
And now the mortals of same faith fight over caste! We can find a reason. Always! Sigh….!! #MaharashtraBandh
— Pulkit Samrat (@PulkitSamrat) January 3, 2018
अभिनेता पुलकित सम्राटनेही ट्विट करत म्हटले की, ‘लोकांनी आता जातीची लढाई सुरू केली आहे. अशा लढाई करण्यासाठी आपण नेहमीच कारणं शोधत असतो.’
Caste & Religion are truly the most despicable, most "anti-national" divisions among people. May all those who seek to divide humanity along these stupid and outdated lines, suffer untold miseries in both life and death.
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) January 2, 2018
संगीत दिग्दर्शक विशाल ददलानीने लिहिले की, ‘लोकांमध्ये जाती- धर्मावरुन वाद व्हावा हे सर्वात निंदनीय आहे. जी लोक अशा बुरसटलेल्या विचारांना मानवतेशी जोडतात अशा लोकांनाच त्यांच्या आयुष्यात अनेक दुःखांचा सामना करावा लागतो.’
Caste Politics, Hindu-Muslim politics- and Class politics – will eventually Destroy India. The Power to rule is dangerous!! CINEMA doesn't Kill Politics Does !
— rahul dholakia (@rahuldholakia) January 2, 2018
This is how Urban Naxalism works. Take things out of context and play Dalit/minority/feminist cards and divide people on these lines.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 4, 2018