सेन्सॉर बोर्डाच्या सहा सदस्यांच्या समितीने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या वादावर आता एक तोडगा काढला आहे. या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार चित्रपटामध्ये काही बदल सुचवत त्याला यू/ए प्रमाणपत्र दिले असून चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करावे, अशी सूचना दिली आहे.
समितीने सुचवलेले बदल अंमलात आणल्यानंतरच सेन्सॉरतर्फे या चित्रपटाला प्रमाणित करणार येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. ज्यामध्ये चित्रपटाच्या नावातील बदलासोबतच आणखी काही बदलही सुचवण्यात आले होते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच दाखवण्यात येणाऱ्या ‘डिस्क्लेमर’मध्ये हा चित्रपट ऐतिहासिक घटनांवर आधारित नसून तो काल्पनिक चित्रपट असल्याचेही स्पष्ट करावे, अशी सूचना सेन्सॉरकडून करण्यात आली आहे. त्याशिवाय समितीने सध्या गाजत असलेल्या ‘घुमर’ या गाण्यातही काही बदल सुचवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी नमते घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, सध्यातरी पद्मावती नव्हे तर, ‘पद्मावत’ याच नावाने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Central Board of Film Certification had examining committee meeting on 28 Dec to review #Padmavati & decided to give it UA certificate along with some modifications & likely change of the title to Padmavat. Certificate to be issued once required & agreed modifications are made. pic.twitter.com/tiFIW2gDGD
— ANI (@ANI) December 30, 2017
The film was approached with balanced view keeping in mind both the filmmakers & society. Considering complexities & concerns around the film the requirement for a special panel was felt by CBFC to add perspective to the final decision: CBFC #Padmavati
— ANI (@ANI) December 30, 2017
वाचा : ‘प्रसिद्ध अभिनेत्रीनेच मला प्रेमात दगा दिला’
CBFC proceeds with certification for `Padmavati`
Read @ANI story | https://t.co/T59Kwjx0Qq pic.twitter.com/7XpRsyzCRc
— ANI Digital (@ani_digital) December 30, 2017
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाच्या वाटेत आलेले हे अडथळे पाहता येत्या काळात ‘पद्मावती’त कोणते बदल करण्यात येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातील २६ दृश्यांवर सेन्सॉरने कात्री लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तेव्हा आता पुन्हा एकदा ‘पद्मावती’च्याच चर्चा सर्वत्र रंगल्या असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जाणकारांनी याविषयी आपल्या प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली आहे.