माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित ‘इंदु सरकार’ सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदील मिळण्याआधीच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी हा सिनेमा त्यांना आधी दाखवण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात निरुपम यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पत्र लिहिले आहे.

पोटापाण्यासाठी कपिलच्या शोवर निर्भर नाही- उपासना सिंग

पहलाज निहलानी यांना लिहिलेल्या पत्रात निरुपम यांनी लिहिले की, ‘मी भरत शहाद्वारे निर्मिती केलेला आणि मधुर भंडारकर दिग्दर्शित ‘इंदु सरकार’ या सिनेमाबद्दल थोडा चिंतीत आहे. सिनेमाच्या ट्रेलरवरुन हा सिनेमा आणीबाणीवर आधारित आहे हे स्पष्ट जाणवते. त्यामुळे या सिनेमात इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना कशा पद्धतीने दाखवण्यात आले आहे, हे आम्हाला पाहायचे आहे.’

हा सिनेमा प्रदर्शनाआधी पाहून ही खात्री करुन घ्यायची आहे की या सिनेमातून कोणत्याही प्रकारे काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्यात आली नाहीये. म्हणूनच निरुपम यांना सिनेमाला प्रदर्शासाठीचा हिरवा कंदील दाखवण्याआधी इंदू सरकार सिनेमा पाहायचा आहे. मधुर भंडारकर दिग्दर्शित या सिनेमात किर्ती कुल्हाडी, नील नितीन मुकेश आणि अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाला अनेक कारणांमुळे विरोध होत आहे.

Kaccha Limbu Motion Poster: साध्या माणसांची स्पेशल गोष्ट

याबद्दल बोलताना मधुर म्हणाले की, ‘आणीबाणीशी निगडीत अनेक गोष्टी सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. त्याबद्दल कोणी आक्षेप घेत नाही, पण मग माझ्या सिनेमावर का आक्षेप घेतला जातो?’ असा प्रश्न मधुरने विचारला. कोणत्याही साहित्यावर मग ते पुस्तक असो किंवा सिनेमा यावर बंदी आणली जाऊ शकत नाही. त्यामुळेच जेव्हा ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमावर बंदी घालण्यात आली होती तेव्हा मधुर यांनी विरोध दर्शवला होता. येत्या २८ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.