प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा अवघ्या पाच वर्षांच्या संसारानंतर पती साहिल संघापासून विभक्त होणार आहे. याविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहित खुद्द दियाने विभक्त होण्याची माहिती देत चाहत्यांना धक्का दिला. अकरा वर्षे सोबत राहिल्यानंतर दोघांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं दियाने या पोस्टमध्ये लिहिलं.

‘विभक्त झाल्यानंतर आमच्यात मैत्री, एकमेकांसाठी प्रेम आणि आदर कायम राहील. यापुढे आमचा प्रवास एकत्र नसला तरी आतापर्यंत एकमेकांसोबत घालवलेला काळ नेहमीच लक्षात राहील,’ अशी पोस्ट दियाने लिहिली. त्याचसोबत खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंतीही तिने केली.

https://www.instagram.com/p/B0nCDW9FBNS/

https://www.instagram.com/p/BpEurf0n-bA/

दिया आणि साहिल व्यावसायिक भागीदार होते. तेथूनच त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ऑक्टोबर २०१४ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. ‘रहना है तेरे दिल मै’, ‘लगे रहो मुन्ना भाई’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दियाने भूमिका साकारल्या आहेत. तसंच अलिकडे आलेल्या ‘संजू’ सिनेमात तिने संजय दत्त याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. मात्र अभिनेत्री म्हणून दियाला फारसे यश लाभले नाही. दियाने बॉबी जासूस या सिनेमाची निर्मितीही केली आहे.