‘खतरों के खिलाडी ११’ हा शो सुरु झाला असून या शोमध्ये कलाकारांचे दमदार स्टंट पाहायला मिळत आहेत. मात्र असं असलं तरी शो सुरु झाल्यापासूनच विविध कारणांमुळे या शोने प्रेक्षकांची नाराजी ओढावून घेतली आहे. नुकतच या शोमध्ये सौरभ राज जैनचं एलिमिनेशन झालं असून चाहत्यांना मात्र हा निर्णय पटलेला नाही. अनेकांनी सौरभला पाठिंबा देत इतर अनेक कलाकारांवर संताप व्यक्त केलाय.

अर्जुन बिजलानी आणि निक्की तांबोळीनंतर काही प्रेक्षकांनी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीवर निशाणा साधला होता. मात्र आता टीका करणाऱ्यांना दिव्यांकाने सडेतोड उत्तर दिलंय. एका युजरने दिव्यांकाला ट्रोल केलं होतं. ” दिव्यांका खूप चतुर आहे. तिने आधी अर्जुन बिजलानीला पाठिंबा दिला आणि नंतर भोळी भाबडी बनत सौरभ जिंकण्यासाठी प्रार्थना करू लागली. लाज वाटली पाहिजे.”

हे देखील वाचा: “हा कोणता व्यायाम?”, आमिर खानच्या वर्कआउट व्हिडीओवर लेकीने व्यक्त केलं आश्चर्य

युजरच्या या टीकेवर आता दिव्यांका त्रिपाठीने उत्तर दिलंय. ट्वीट करत ती म्हणाली, “डियर तसं तर मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही पण मला सौरभ आवडतो म्हणून मी सांगतेय. मी ते गमतीने म्हणाले होते. त्या आधी आणि नंतर देखील मी बरचं काही बोलले होते. जसं की तो शाकाहारी आहे वैगरे..पण ते दाखवलं गेलं नाही. (प्रसारणाच्या नियमांमुळे कदाचित ते दाखवलं गेलं नसेल) तुम्ही जे टीव्हीवर पाहता त्याहून बरचं काही जास्त घडलेलं असतं.” असं म्हणत दिव्यांकाने ट्रोल करणाऱ्याला उत्तर दिलंय.

हे देखील वाचा: “तुझं वाढतं वय पाहून वाईट वाटतं”; युजरच्या कमेंटवर कोंकणा सेनशर्माने दिलं उत्तर म्हणाली…

दिव्यांकाच्या या उत्तरावर सौरभ राज जैनने देखील एक ट्वीट केलं आहे. तो म्हणाला, “दिव्यांका तू माझ्याशी खूप चांगली वागलीस. जे काही झालं त्यानंतर केलेल तुझे स्वीट मेसेजेस माझ्या अजूनही लक्षात आहेत. आपल्या दोघांच्या भावना सारख्याच आहेत.”असं तो म्हणालाय.

‘खरतों के खिलाडी ११’ या शोमध्ये नुकत्याच झालेल्या एका स्टंट राउंडमध्ये अर्जुन बिजलानीला स्टंट पूर्ण करण्यास अपयश आल्याने तो एलिमिनेशन राउंडमध्ये पोहचला होता. मात्र यावेळी होस्ट रोहित शेट्टीने अर्जुनला त्याच्याजवळ असलेल्या के मेडलचा वापर करुन स्वत:ला वाचवण्याची संधी दिली. यावेळी अर्जुनने स्वत: सेव्ह होतं सौरभला एलिमिनेशन राउंडमध्ये टाकलं. सौरभ उत्तम स्पर्धक असून त्याला एलिमिनेट व्हावं लागल्याने प्रेक्षक चांगलेच संतापले.