आलिया भट्ट आणि विकी कौशल यांची उल्लेखनीय कामगिरी असलेल्या ‘राजी’ या चित्रपटाची बॉक्स ऑफीसवर घोडदौड सुरूच आहे. चांगल्या कमाईने ओपनिंग करणारा हा या वर्षातला पाचवा चित्रपट ठरला असून प्रदर्शनानंतरच्या नवव्या दिवशी, शनिवारी ‘राजी’नं तब्बल ७.५४ कोटींचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ६८.८८ कोटींची कमाई केली आहे.

‘राजी’च्या या यशासाठी उत्तम कथा, कलाकारांचं दमदार अभिनय आणि सर्वोत्तम संवाद या गोष्टी कारणीभूत आहेत. एका महिला गुप्तहेराच्या जीवनावर आधारित या चित्रपटात आलिया आणि विकीनं अप्रतिम अभिनय केला आहे. प्रेक्षक- समीक्षकांकडून दोघांचंही कौतुक होत आहे. ‘ऐ वतन’ सारखं देशभक्तीपर गाणं असो किंवा मग त्यातील दमदार संवाद, प्रेक्षकांना या चित्रपटातील बऱ्याच गोष्टी भावल्या आहेत. सिनेमागृहात प्रेक्षकांची दाद मिळवणारे हे दमदार संवादा कोणते आहेत ते पाहूयात..

१. वो आसमान देख रहे होंगे..और हम उनके पांव तले से जमीन खींच लेंगे

shishir sharma
शिशिर शर्मा

२. मै चाहता हूँ.. तुम हिंदुस्तान की आँख और कान बनके रहो

३. एक भूल..एक चूक हुई..तुम्हारी लाश जमीन पे पडी होगी

४. हमारे इतिहास मे ऐसे लोग है, जिन्हे कोई इनाम या मेडल नहीं मिलता. हम उनका नाम तक नहीं जानते है, ना ही उन्हे पहचानते है..सिर्फ वतन के झंडे पर अपनी याद छोड जाते है

५. वतन के आगे कुछ नाही..खुद भी नही