सर्वाधिक चर्चेत असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या वर्षी तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनीच्या मुलाशी लग्नगाठ बांधली. समंथा आणि नागा चैतन्य यांच्या विवाहसोहळ्याची चर्चा बॉलिवूडमध्येही पाहायला मिळाली. ‘ये माया चेसावे’ या चित्रपटातून तिने टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि यशाचं शिखर गाठलं. विविध ढंगाच्या भूमिका साकारणाऱ्या समंथाचा आज वाढदिवस आहे. नागार्जुन अक्किनेनीची सून झालेल्या समंथाबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात..

समंथाचा जन्म चेन्नईत झाला असून वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी राहिलेल्या या अभिनेत्रीने तेथीलच मॅरिस महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या समंथाने नंतर चित्रपटसृष्टीची वाट धरली.

गौतम मेननच्या ‘ये माया चेसावे’ने तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. विशेष म्हणजे या चित्रपटात तिच्या हिरोची भूमिका नागा चैतन्यनेच केली होती. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या चित्रपटाचा नंतर ‘विन्नै थंदी वरुवाया’ हा तमिळ रिमेक आला. यात समंथाने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारलेली. यानंतर ती ‘बाना कथाडी’ आणि ‘मोस्कोविन कावेरी’ या चित्रपटांमध्येही झळकली.

https://www.instagram.com/p/BhigS8OHRln/

समंथाला आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवण्यासाठी महेश बाबूचा ‘दुकूडू’ हा चित्रपट महत्त्वाचा ठरला. चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीला एस एस राजामौलींच्या ‘इगा’ने (तमिळमध्ये ‘नान ए’) तेलगू चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारुपास आणले. अभिनेता नानीच्या तोडीस तोड भूमिका करण्याची संधी यात समंथाला मिळाली. दोन भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

https://www.instagram.com/p/BhAUprOHeML/

वाचा : पन्हाळा जिंकण्यासाठी जीवाजी बाजी लावणाऱ्या ‘फर्जंद’च्या धाडसाची गाथा 

‘येतो वेल्लीपोयनिधी मनसु’ या २०१२ साली आलेल्या द्विभाषिक चित्रपटाने तिकीट बारीवर फारशी कमाल केली नाही. मात्र, यातील समंथाच्या अभिनयाची बरीच प्रशंसा करण्यात आली. त्यानंतर पुढची दोन वर्षे तिने एकाही तमिळ चित्रपटात काम केले नाही. त्यावेळी तिने ‘रमैय्या वस्तावैया’वर लक्ष केंद्रित करत काही चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराच्याच भूमिका साकारण्यास प्राधान्य दिले.

https://www.instagram.com/p/BgbLzVlnCWr/

न्यूड : ‘कपडा जिस्म पे पहनाया जाता है, रुह पे नही’

‘मनम’ हा समंथाच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा चित्रपट ठरला. यात अक्किनेनी कुटुंबातील अक्किनेनी नागास्वरा राव, नागार्जुन, नागा चैतन्य, अखिल अक्किनेनी यांच्या मुख्य भूमिका होत्या. तेव्हा हिट ठरलेल्या या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. ‘मनम’नंतर समंथाने व्यावसायिक चित्रपटांना प्राधान्य देत ‘अंजान’ या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले. तेलगू चित्रपटसृष्टीत भक्कम स्थान असलेल्या या अभिनेत्रीने विजय, विक्रम, सुरिया आणि धनुष यांसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत रुपेरी पडद्यावर भूमिका साकारल्या आहेत.

https://www.instagram.com/p/BZ71Cw7hGKt/

नागा चैतन्यशी लग्न झाल्यानंतर समंथा तिचे काम सुरुच ठेवणार असून, तिच्या हातात सध्या काही मोठे चित्रपट आहेत.