‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटला तरी त्याची चर्चा अजूनही थांबलेली नाही. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं कौतुक प्रेक्षक-समीक्षकांकडून झालं. आता बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याने हा चित्रपट पाहिला आणि त्याची स्तुती करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. हृतिकने ट्विट करत अजय देवगण व संपूर्ण ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या टीमची वाहवा केली आहे.

‘आताच ‘तान्हाजी’ चित्रपट पाहिला. अतुलनीय चित्रपट आहे. सर्वोत्तम साहसदृश्ये पाहायला मिळाली. अजय देवगण काजोल यांचं अभिनय पाहून त्यांना नमन करावंस वाटतंय. सैफ अली खाननेही उत्तम कामगिरी केली. संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांची जितकी स्तुती करावी ती कमीच आहे. नेहा शर्माचंही अभिनय दमदार होतं. अप्रतिम चित्रपट आहे’, अशा शब्दांत हृतिकने स्तुतीसुमने वाहिली.

main hoon na movie completed 20 years interesting facts
‘मै हूँ ना’ चित्रपटाची २० वर्षे : तब्बूचा काही सेकंदाचा कॅमिओ ते गौरी खानची पहिली निर्मिती, जाणून घ्या न ऐकलेले किस्से
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…

हृतिकचे हे ट्विट पाहून अजयनेही आनंद व्यक्त केला. ‘तान्हाजी’ या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली असल्याचं त्याने सांगितलं.

पाहा व्हिडीओ : डॉ. अमोल कोल्हेंनी उलगडली मालिकेसोबत झालेल्या राजकारणाची गोष्ट

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.