‘इंडियन आयडल’चं बारावं पर्व यंदा चांगलंच चर्चेत आलं आहे. या शोमधील अनेक सत्य समोर आल्याने नेटकऱ्यांकडून वेळोवेळी या शोवर आणि शोमधील जजेसवर टीका कऱण्यात आलीय. यातच या आठड्यात देखील ‘इंडियन आयडल’मधील एक दमदार स्पर्धक स्पर्धेच्या बाहेर गेलाय. या आठवड्यात स्पर्धक आशिष कुलकर्णीचं एलिमिनेशन झाल्याने चाहते चांगलेच संतापले असून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

आशिषच्या एलिमिनेशन नंतर आता शोमध्ये पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल , मोहम्मद दानिश, सायली कांबळे,शनमुखप्रिया आणि निहाल तारो हे स्पर्धक उरले आहेत. यातील शनमुखप्रियाला या आधी तिच्या गाण्याच्या स्टाइलवरून अनेकदा ट्रोल करण्यात आलंय. शिवाय तिला या शोमधून बाहेर करावं अशी मागणी करण्यात आलीय. मात्र आशिष शोमधून बाहेर झाल्याने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केलाय. आशिषचं एलिमिनेशन करण्याचा निर्णय योग्य नसल्याचं अनेकांचं मत आहे.

हे देखील वाचा: “काळ्या मुली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाहीत’; ‘ती’ महिला सोनाली कुलकर्णीला म्हणाली होती

एक युजर ट्विटरवर म्हणाली, “आशिष कुलकर्णी शो मधील अष्टपैलू गायक होता. तो खूप हुशार आहे. ‘इंडियन आयडल’ हा पक्षपात करणारा शो असून. सोनी टीव्हीवरील सर्वात मूर्ख असा फिस्क्ड शो आहे.”

हे देखील वाचा: सहा महिन्यांची झाली विरुष्काची लाडकी लेक ‘वामिका’; अनुष्का शर्माने शेअर केले सेलिब्रेशनचे क्यूट फोटो

तर आणखी एक युजर म्हणाली, “आशिष कुलकर्णीच्या एलिमिनेशनमुळे इंडियन आयडल शोमधील विश्वास आणि रस पूर्ण नाहिसा झालाय. तो शोमधील एक उत्कृष्ट आणि अष्टपैलू गायक होता. ट्रॉफी कोणाला द्यायची हे तुम्ही आधीच ठरवलं आहे वाटतं. वाईट राजकारण” असं म्हणत या युजरने संताप व्यक्त केलाय.

;

त्यातसोबत आशिषने देखील त्याच्या एलिमिनेशननंतर एक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलंय. यात आशिषने त्याला सपोर्ट करणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तो म्हणाला, “इंडियन आयडलचा अखेरचा दिवस. माझ्याकडे शब्द नाहीत. या छोट्याश्या प्रवासात मला सर्वांचं कौतुक करायचंय. या शोमधील सर्व स्पर्धकांचं देखील मी कौतुक करतोय.” असं म्हणत आशिषने त्याला येत्या काळात सर्व स्पर्धकांसोबत काम करण्याची इच्छा असल्याचं तो पोस्टमध्ये म्हणाला आहे.