बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांमध्ये एकेकाळी रणबीर कपूर आणि कतरिना कैफची जोडी आघाडीवर होती. मात्र, जवळपास वर्षभरापूर्वी या दोघांचा ब्रेकअप झाला आणि त्यांचे सहा वर्षांचे प्रेम एका क्षणात संपले. वेगळं झाल्यानंतर या दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपचे कारण समोर येऊ दिले नाही. ‘जग्गा जासूस’ चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात हे दोघं एकत्र दिसले पण त्यांच्यात तेव्हा सर्व काही आलबेल असल्याचे दिसले नाही.

वाचा : ‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’लाही कात्री?

नुकताच क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा मुंबईत रिसेप्शन सोहळा झाला. त्यावेळी कतरिना आणि रणबीर या दोघांनाही आमंत्रित करण्यात आले होते. या रिसेप्शनमध्ये हे दोघं एकमेकांसमोर आल्याचे वृत्त आता समोर आले आहे. ‘फिल्मफेअर’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर आणि कतरिना काही वेळाच्या अंतराने पार्टीत सहभागी झाले आणि ते त्यांच्या मित्रांसोबत पार्टीचा आनंद घेत होते.

वाचा : सलमानने धर्मेंद्र यांना दिला आश्चर्याचा धक्का

पार्टीचा आनंद लुटत असताना एक वेळ अशी आली जेव्हा कतरिना उभी असलेल्या ठिकाणीच रणबीर नेमका जाऊन पोहोचला. कतरिना त्यावेळी करण जोहर, अयान मुखर्जी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याशी बोलत होती. पण, रणबीरचा सामना करावा लागू नये म्हणून कतरिनाने तेव्हा तेथून निघून जाणे योग्य समजले. विराट – अनुष्काच्या रिसेप्शनला कतरिना तिची बहिण इजाबेल हिच्यासोबत गेली होती.