रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामधील अनोखी केमिस्ट्री ‘जग्गा जासूस’मध्ये दाखवण्यात येणार आहे. ‘जग्गा जासूस’च्या ट्रेलरपासून ते गाण्यापर्यंत सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता या सिनेमाचे ‘फिर वही’ हे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात रणबीरची भावनिक बाजू दाखवण्यात आली आहे. हे गाणं जग्गा आणि त्याचे वडील यांच्यातील नातेसंबंधांवर भाष्य करणारे आहे. या सिनेमात जग्गा त्याच्या वडिलांच्या शोधात असतो. कलकत्ता ते मोरक्कोपर्यंत तो आपल्या वडिलांचा शोध घेत असतो. या शोध मोहिमेत येणारे अडथळे, त्यातून मार्ग काढणारा जग्गा यावर हा सिनेमा बेतला आहे.
पोटापाण्यासाठी कपिलच्या शोवर निर्भर नाही- उपासना सिंग
या गाण्यात जग्गा त्याने वडिलांसोबत घालवलेले क्षण आठवताना दिसत. लहानगा जग्गा आणि त्याचे वडील यांच्यामधील एक अनोखं नातं या गाण्यातून दाखवण्यात आलं आहे. अमिताभ भट्टाचार्यने या गाण्याचे बोल लिहीले असून, तरुणाच्या गळ्यातला ताईत मानल्या जाणाऱ्या अरिजित सिंगने हे गाणं गायलं आहे. ‘बर्फी’ सिनेमातील ‘सावली सी रात’ या गाण्याच्या चालीशी मिळते जुळते हे गाणे वाटते. या गाण्याशिवाय सिनेमातल्या अनेक गोष्टी या ‘बर्फी’ सिनेमाशी साम्य साधणारे आहेत. या दोन्ही सिनेमांमधील समान धागा म्हणजे अनुराग बासु आणि रणबीर कपूर. त्यामुळे हा सिनेमा नक्की कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते.
दिग्दर्शक अनुराग बासुने आपल्या या सिनेमात अभिनेता रणबीर कपूरला एका वेगळ्या अंदाजात दाखण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा हा प्रयत्न प्रेक्षकांना किती पसंत पडतो हे तर येणारा काळच ठरवेल. याआधीही रणबीरने कॉलेज तरुणाची भूमिका साकारली होती. पण ‘जग्गा जासूस’ या सिनेमातून तो पहिल्यांदा एका शाळकरी मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे.
बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मान्यताची अशी झाली संजयच्या आयुष्यात एण्ट्री
दिग्दर्शक अनुराग बासु ‘बर्फी’ या त्याच्या सिनेमानंतर पुन्हा एकदा रणबीर कपूरसोबत काम करत आहे. सिनेमा सुपरहिट होईल अशी आशा धरून असलेला रणबीर या सिनेमाचा निर्माताही आहे. रणबीर आणि कतरिनाच्या चाहते या सिनेमाची फार आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा आधीच ३ वर्षांनंतर प्रदर्शित होत आहे. येत्या १४ जुलैला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.