सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील जितेंद्र जोशीचा ‘दोन स्पेशल’ हा कार्यक्रम एकाच एपिसोडनंतर चर्चेत आहे. ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमात कलाकारांच्या आयुष्यातील जगासमोर न आली गुपिते समोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अभिनयाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून त्यांच्या रोजच्या जगण्यातले अनुभव, त्यांची मते, त्यांचे विचार गप्पांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात अभिनेता सुबोध भावे व सुमीत राघवन या दोन मित्रांनी हजेरी लावली होती. या दोघांच्या आयुष्यातील बरेचसे किस्से कार्यक्रमात ऐकायला मिळाले.

दरम्यान कार्यक्रमात जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर होणारा अरेरावी आणि एकेरी उल्लेखा बाबत चीड व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गाजलेला विषय म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्याच्या सभेत भर पावसात केलेले भाषण. सोशल मीडियावर हे भाषण चर्चेचा विषय ठरलेला होता. अनेकांनी शरद पवार यांच्या कृतीचे कौतुक केले. मात्र त्याचवेळी अनेकांनी खास करून विरोधकांनी त्यांना या विषयावरून ट्रोल सुद्धा करण्याचा प्रयत्न केला.

Amit Shah viral video FIR
अनुसूचित जाती-जमातींचं आरक्षण रद्द होणार? अमित शाहांच्या ‘त्या’ व्हायरल VIDEO प्रकरणी गुन्हा दाखल!
chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
Sudhir Mungantiwar reacts on social media trolling about controversial statement against congress
“काँग्रेसविरोधात मी असाच बोलत राहणार,” सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “भाषणाचा अर्धवट व्हिडिओ…”
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!

जितेंद्र जोशीने कार्यक्रमात ट्रोलर्समुळे आलेला वाईट अनुभव सांगितला आहे. शरद पवार यांचा पावसात भिजून भाषण देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अनेकांनी ‘आरे’ ‘तुरे’ची भाषा वापरुन त्यांना ट्रोल केले. ‘मी शरद पवार यांचा पावसात भिजत भाषण देतानाचा फोटो पाहिला. त्याच्यावर लोकांनी खाली आरे, तुरे लिहित कमेंट केल्या होत्या. अनेक वर्षे, एका माणसाने काही काळ त्या क्षेत्रात घालवली आहेत. त्याच्या विषयी आदराने तरी बोला’ अशा शब्दात सोशल मीडियावर एकेरी आणि अर्वाच्च भाषेत होणाऱ्या ट्रोलिंगवर जितेंद्रने संताप व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणूकी दरम्यान शरद पवारांनी सातारा येथे सभा घेतली होती. दरम्यान तेथे अचानक पाऊ पडू लागला. मात्र शरद पवार यांनी न थांबता भाषण सुरु ठेवले. भर पावसात त्यांनी केलेल्या भाषणाची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. त्यांचा हा उत्साह पाहून कार्यकर्तेही भारावून गेले होते.