आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारा अभिनेता आणि स्वयंघोषित समीक्षक कमाल आर खान याने आता पुन्हा एक वादग्रस्त ट्विट केले आहे. हे ट्विट कोणत्याही अभिनेत्याबद्दल किंवा अभिनेत्रीबद्दल नाही तर त्याने यावेळी चक्क विराट कोहलीला लक्ष केलं आहे. अनिल कुंबळेने भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता रवी शास्त्री यांना टीम इंडियाचे प्रशिक्षक बनवण्यात येईल असे म्हटले जात आहे. या संबंधीत एका बातमीला ट्विट करत केआरकेने कोहलीवर हल्लाच चढवला.

आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीला डेट करतोय हा स्टार किड

ipl 2024 shubman gill fan girl shaini jetani trolled fans saying she making gujarat titans captain lose his focus
“शुबमन गिल तुझ्यामुळे आउट होतोय”; चाहतीच्या ‘त्या’ VIDEO तील कृत्यांवर भडकले नेटिझन्स; म्हणाले, “स्वप्न…”
Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
Former MLA Narayanarao Gavankar withdraws from Akola Lok Sabha constituency
माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांची माघार, अकोला भाजपमधील बंड…

केआरके म्हणाला की, कुंबळे हा खूप प्रामाणिक माणूस आहे. पण कोहलीला रवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून आल्यास जास्त आनंद होईल याचं मुख्य कारण म्हणजे तेही कोहलीसारखेच भ्रष्ट आहेत. दोन दिवसांपूर्वीच अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला. असं म्हटलं जातं की, विराट आणि कुंबळे यांच्यात विस्तवही जात नव्हता. त्यामुळे वेस्ट इंडीज दौऱ्याच्या आधीच कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्रीच नवे प्रशिक्षक बनतील या बातमीवर आपले मत व्यक्त करताना केआरकेने शास्त्री आणि कोहली या दोघांनाही भ्रष्ट म्हटले आहे.

केआरकेच्या या ट्विटवर अनेक ट्विटरकरांनी त्याची खिल्ली उडवत म्हटले की, विराट कोहलीने देशासाठी खूप काही केलं आहे. त्यामुळे कोहलीविरोधात काही बोलण्याआधी तू विचार केला पाहिजे. तर काहीजणांनी त्याच्या ट्विटवर सहमत दर्शवत पहिल्यांदा तू काही तरी योग्य लिहिलंस असं म्हटलं.