बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने त्याच्या अनोख्या अभिनय शैलीमुळे कलाविश्वामध्ये स्वत:च असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गंभीर, विनोदी अशा एक ना अनेक भूमिका त्याने साकारल्या असून त्याच्या याच भूमिकांमुळे त्याने प्रेक्षकांमध्ये एक वेगळी छाप पाडली आहे. सैफने २०१२ मध्ये अभिनेत्री करिना कपूरसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांमध्ये तब्बल १० वर्षांचं अंतर असून ही जोडी कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. अनेक वेळा या दोघांच्या वयातील अंतरामुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगते. या दोघांची लव्हस्टोरी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहतेही उत्सुक असतात. विशेष म्हणजे सैफशी लग्न करण्यापूर्वी करिनाने सैफसमोर एक अट ठेवली होती.

‘टशन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सैफ आणि करिना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ‘कुर्बान’ चित्रपटातही दोघांमधील रोमॅण्टिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. सैफसोबत लग्न करण्यापूर्वी करिनाने त्याच्या पुढे एक अट ठेवली होती. कायम स्वावलंबी राहण्याला महत्व देणाऱ्या करिनाला लग्नानंतरही तसंच रहायचं होतं. त्यामुळे तिने लग्न करण्यापूर्वी सैफसमोर अशीच अट ठेवली होती. एका मुलाखतीदरम्यान तिने सैफला जोडीदार म्हणून का निवडलं या मागचं कारण सांगितलं. ती म्हणाली की, ‘मला स्वावलंबी राहणं जास्त आवडतं. लग्नानंतरही मला चित्रपटात काम करायचं आहे. पत्नी किंवा आई झाल्यानंतरही माझ्या करिअरवर त्या गोष्टींचा कोणताच परिणाम होता कामा नये असं मला वाटतं.’

Indians are eligible for multi-entry Schengen visa for longer validity Why Changes in Schengen Visa Rules Matter
विश्लेषण : भारतीयांसाठी युरोपियन युनियनची भेट… शेंगन व्हिसाच्या नियमांमध्ये केलेले बदल महत्त्वाचे का?
meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
99 fights among psychiatric patients in three years in Nagpur
नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक

या अटीसंदर्भात ती पुढे म्हणाली की, ‘मला आयुष्यभर पैसे कमवायचे आहेत. लग्नानंतरही चित्रपटसृष्टीत करिअर करणार असल्याची अट मी सैफसमोर ठेवली. या गोष्टीला त्याचा नकार नव्हता, म्हणून मी लग्नासाठी तयार झाले.’ अटीप्रमाणेच करिना लग्नानंतरही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे.