गेल्या आठवड्यात टॉलिवूडची प्रसिद्ध जोडी ‘चैसम’ म्हणजेच नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू हे लग्नाच्या बेडीत अडकले. गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असलेल्या या ‘लव्ह बर्ड्स’ने गोव्यात हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही विवाहपद्धतीनुसार लग्न केले. या सोहळ्याला दोघांचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्रमंडळी उपस्थित राहिले होते. गोव्यातील ‘डब्ल्यू रिसॉर्ट’मध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्याचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर आता ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर समंथाने तिचे आडनाव बदलून अक्किनेनी असे केले.

समंथाने आडनाव बदलल्यानंतर ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अनेकांनी तिचे कौतुक केले. काहींनी ‘आडनाव बदलून भारतीय संस्कृतीसाठी तुझ्या मनात असलेला आदर दाखवलास,’ अशी कमेंट केली. लग्नानंतर समंथा आणि नागा चैतन्य दोघेही आपापल्या कामात व्यग्र झाले आहेत. समंथाचा ‘राजू गारी गांधी २’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे तर नागा चैतन्य त्याच्या आगामी ‘सव्यसाची’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र झाला आहे.

Food to Avoid in Morning
सकाळी उठल्याबरोबर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पाच पदार्थ; रिकाम्या पोटी खाल्ल्याने उद्भवू शकते गंभीर समस्या; लगेच घ्या जाणून
chaturang
सांधा बदलताना : सोबतीचे बळ!
Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल

वाचा : टेलिव्हिजनवरही बिग बीच ‘शहेनशहा’

समंथा आणि नागा चैतन्यचे लग्न हा यावर्षीचा सर्वांत जास्त चर्चेचा विषय ठरला. या लग्नाबद्दलच्या लहानसहान गोष्टी जाणून घेण्यासाठी दोघांचे चाहते उत्सुक होते. दोघांच्या साखरपुड्यापासूनच या जोडीला भावी आयुष्यासाठी चाहत्यांनी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली होती.