स्वर्गीय अभिनेते सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्तच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. जसे त्याचे आयुष्य संकटांनी भरलेले होते तशीच काहीशी त्याची प्रेमकहाणीही चढ- उतारांनी भरलेली होती. पण शेवटी ५७ वर्षीय संजयच्या हृदयावर राज्य केले ते मान्यता दत्तनेच. चला तर मग जाणून घेऊया त्याची मान्यतासोबतची प्रेम कहाणी नेमकी होती तरी कशी…
अरुण गवळीमुळे ढकलली ‘डॅडी’च्या प्रदर्शनाची तारीख
१९८१ मध्ये ‘रॉकी’ सिनेमातून संजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९८७ मध्ये अभिनेत्री ऋचा शर्माशी त्याने लग्न केले. ऋचा आणि त्याला एक मुलगीही आहे. संजयने आपल्या मुलीचे नाव त्रिशाला दत्त असे ठेवले. लग्नाच्या काही वर्षांनंतर संजय आणि ऋचा वेगळे झाले. त्यानंतर ऋचा मुलगी त्रिशलाला घेऊन आपल्या आई- वडिलांकडे अमेरिकेत गेली.
माधुरी दीक्षितसोबतही त्याचे नाव ‘थानेदार’ सिनेमापासून जोडायला सुरूवात झाली. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान संजय, माधुरीच्या सौंदर्यावर फिदा झाला होता. या सिनेमानंतर दोघंही ‘साजन’ सिनेमात एकत्र दिसले होते. माधुरी आणि संजयची प्रेमकहाणी पुढे जाणार एवढ्यात संजयच्या आयुष्यात १९ एप्रिल १९९३ रोजी मोठं वादळ आलं. संजयला टाडा अंतर्गत अटक करण्यात आले. यानंतर त्याला अनेकदा जामिन मिळाला आणि अनेकदा तो उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगातही गेला. पण माधुरी त्याला भेटायला एकदाही तुरुंगात गेली नाही. या दरम्यान १९९६ मध्ये संजयची पहिली पत्नी ऋचाचा मृत्यू झाला आणि त्यांची मुलगी त्रिशाला अमेरिकेतच आजी- आजोबांकडे राहायला लागली.
यानंतर संजयचे नाव मॉडेल रिया पिल्लईसोबत जोडले गेले. रिया, संजयला भेटायला अनेकदा तुरुंगात जायची. १९९८ मध्ये तुरुंगातून निघाल्यानंतर संजयने व्हॅलेंटाइन डेला रियाला लग्नाची मागणी घातली. दोघांनी मंबईतील एका मंदिरात लग्नही केले. काही वर्षांपर्यंत तर सर्व काही ठीक होते. पण त्यानंतर संजयचं नाव नाडिया दुरानीसोबत जोडले गेले. संजयची नाडियाशी ओळख २००२ मध्ये ‘काँटे’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अमेरिकेत झाली. २००२ मध्ये संजय आणि त्याची दुसरी पत्नी रिया एकमेकांपासून दूर झाले.
संजय परत एकदा एकटा पडला. पण त्यानंतर २००६ मध्ये एका व्हिडिओमध्ये संजय एका मुलीसोबत दिसला होता. या व्हिडिओमध्ये त्या मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तेव्हा संजयने मित्रांना ती त्याची प्रेयसी असल्याचे सांगितले होते. एवढेच नाही तर लवकरच ते लग्न करणार असल्याचेही तो म्हणाला होता. लोक त्याच्या या नव्या नात्याबद्दल कुजबूज करत असतानाच संजय स्टार स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात मान्यताला घेऊन गेला होता. मान्यताने २००३ मध्ये प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ सिनेमात आयटम साँग केले आहे. १९ नोव्हेंबर २००६ मध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राने संजय आणि मान्यताने लग्न केल्याची बातमी प्रसिद्ध केली होती.
संजय आणि मान्यताने रात्री ३ वाजता पत्रकरांना फोन करुन लग्न केल्याची बातमी छापण्यास सांगितले होते. पण संजयने मात्र या वृत्ताला नकार देत मान्यतासोबत लग्न न केल्याचे म्हटले. पण त्यानंतर सुत्रांमार्फत हे स्पष्ट झालं की आता संजयच्या हृदयावर आता फक्त मान्यताचाच अधिकार आहे. तो आपले महत्त्वाचे निर्णय मान्यताला विचारूनच घेत होता. ३१ जुलै २००७ मध्ये संजयला दहशतवादी असण्याच्या आरोपातून मुक्त करण्यात आले. अवैध्यरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजयला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी संजूबाबाला तुरुंगात नेले जात होते तेव्हा मान्यताही त्याच्या मागे जाताना दिसली.
प्रभास-अनुष्काने लावला हिंदीचा क्लास!
२३ ऑगस्ट २००७ मध्ये संजयला जामिन मिळाला आणि या प्रवासादरम्यान मान्यता त्याच्यासोबत होती. त्याला जेवढे दिवस सुट्टी होती त्यातील एक दिवस त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की. शेवटचे २-३ दिवस राहिले आहेत आणि ते मला कुटुंबियांसोबत घालवायचे आहेत. यावरुन हे स्पष्ट होतं की मान्यता ही त्याच्या कुटुंबियांची सदस्य झाली होती. संजय कुठेही जायचा तिथे मान्यता त्याच्यासोबत असायची. संजयने शिंगणापुर मंदिरात पुजाही केली होती. अशी पुजा ही फक्त पत्नीसोबतच केली जाते हे सिद्ध झाले. २२ ऑक्टोबर २००७ मध्ये संजयला परत एकदा तुरुंगात जावे लागले होते.
९ फेब्रुवारी २००८ मध्ये मान्यता जेव्हा एका पार्टीमध्ये गेली असता तिच्या भांगामध्ये कुंकू भरलेले दिसले. यानंतर संजय दत्तकडून बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या एका जाहिरातीत त्याच्यासोबत मान्यता दत्तचे नावही लिहिले होते. तोपर्यंत संजय आणि मान्यताने स्वतःहून त्यांच्या लग्नाची कबूली दिली नव्हती. ११ फेब्रुवारी २००८ मध्ये संजय आणि मान्यताने हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले होते.