छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या श्वेता केप्टाउनमध्ये 'खतरों के खिलाडी ११'चे चित्रीकरण करत आहे. ती सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी श्वेता आणि तिचा दुसरा पती अभिनव कोहली यांच्यामध्ये मुलगा रेयांशवरुन वाद झाला होता. अभिनवने श्वेतावर अनेक आरोप केले होते. आता श्वेताचा पूर्वाश्रमीचा पती राजा चौधरीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. नुकताच राजाने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला मुलाखत दिली. त्यावेळी तो श्वेता आणि तिचा पती अभिनवमध्ये सतत होणाऱ्या भांडणावर म्हणाला, 'हो, श्वेता एक उत्कृष्ट आई आणि एक चांगली पत्नी आहे यात शंका नाही. हा केवळ एक योगायोग आणि तिचे दुर्दैव आहे की तिचे दुसरे लग्नही अयशस्वी ठरले. याचा अर्थ असा नाही की ती चुकीची आहे किंवा ती वाईट व्यक्ती आहे.' आणखी वाचा : कोरिओग्राफर गीताने केले लग्न? व्हायरल झालेला फोटो पाहून म्हणाली.. राजा पुढे म्हणाला की श्वेताने अभिनवला त्याच्या मुलाला भेटण्याची परवानगी द्यावी. 'श्वेताला समजायला हवे की तिच्या आणि अभिनवच्या आयुष्यात कोणत्याही समस्या असल्या तरी एक वडील आपल्या मुलाचे किंवी मुलीचे कधीही नुकसान करीत नाही' असे तो म्हणाला. View this post on Instagram A post shared by Raja Chaudhary (@rajachaudhary) श्वेताने अभिनवशी लग्न करण्यापूर्वी राजाशी लग्न केले होते. मात्र त्यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. पलक ही श्वेता आणि राजाची मुलगी आहे. मार्च महिन्यात राजा तिला भेटला होता. जवळपास १३ वर्षांनंतर राज आणि पलकची भेट झाली होती. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर तिच्या सोबतचे काही फोटो शेअर केले होते.