अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. पुन्हा एकदा श्वेताने तिच्या दोनही लग्नांमुळे मुलांच्या आयुष्यावर झालेल्या परिणामांबद्दल खुलासा केला आहे. दोन लग्न आणि त्यातील वाद यामुळे मुलांना खूप काही सहन करावं लागलं यावर बोलताना श्वेताने आपली दोनही पुरुषांबाबत निवड चुकल्याचंही म्हंटलं आहे.

श्वेता तिवारीने ती 19 वर्षांची असताना अभिनेता राजा चौधरीसोबत विवाह केला होता. मात्र राजा चौधरीच्या जाचाला कंटाळून तिने घटस्फोट घेतला. यादरम्यान त्यांची मुलगी पलक हिला बरचं काही सोसावं लागलं.तर 2013 मध्ये तिने अभिनेता अभिनव कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. रेयांशच्या जन्मानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले.

श्वेता तिवारीने बॉलिवूड बबलला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या दोन लग्नांमुळे मुलांच्या बालमनावर आघात झाल्याचं म्हंटलं आहे. या सगळ्यात मुलांची काही चूक नसताना त्यांना बरचं काही भोगावं लागल्याचं ती म्हणाली.श्वेता म्हणाली, ” माझी दोन्ही मुलं त्यांचं दुख: मला जाणवू देत नाहित. मला वाटतं ते त्यांचं दुख: लपवण्याचा प्रयत्न करतात. राजा चौधरीसोबत लग्न मोडण्याचा मी निर्णंय घेतला तेव्हा पलक फक्त सहा वर्षांती होती. पण तिने मला मारहाण होताना पाहिलंय. तिने इतर महिलांना घरी येताना पाहिलंय. माझ्या घरी पोलिस येताना पाहिले आहे, मी तिला अनेकदा पोलिसांकडे नेलयं. हा सर्व आघात तिने सहन केलाय.” असं श्वेताने तिच्या मुलाखतीत सांगितलं आहे.

तर अभिनव कोहलीसोबत पुन्हा लग्न करून मोठी चूक केल्याचं श्वेताचं म्हणणं आहे. “माझा मुलगा अवघ्या चार वर्षांचा आहे मात्र त्याला पोलीस, जज या सगळ्यांबद्दल माहिती आहे.” पुढे ती म्हणाली. एवढं सगळ सहन करूनही माझी मुलं कायम हसत आणि आनंदी राहतात. अनेकदा असं वाटतं त्यांच्या वाट्याला आलेल्या दुख:साठी मी जबाबदार आहे. मी चूकीच्या पुरुषांची निवड केल्याने त्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे.

१३ वर्षांच्या दुराव्यानंतर श्वेता तिवारीच्या मुलीची वडिलांशी भेट

श्वेता तिवारी म्हणाली आहे कि हे सर्व तिने मुलांसाठीच केलं आहे. “कारण चिखलात रुतून बसण्यापेक्षा त्यातून बाहेर पडणं गरजेचं होतं. त्यासाठी मला हे पाऊल उचलणं भाग पडलं.” असं तिने म्हंटलं आहे. श्वेता तिवारी सोशल मीडियावर अनेकदा तिच्या मुलांसोबत फोटो शेअर करत असते.श्वेता तिवारीची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.