स्वामिनी मालिका आता रंजक वळणावर आली आहे. निरागसपणे वाड्यात बागडत, हसत सार्‍यांना मोहात पाडत आणि पेशवाई संस्कारात घडत रमाबाई मोठ्या झाल्या आणि शनिवारवाड्यात आल्या. शनिवारवाड्यातील रमाबाईंचा प्रवास तसा कठीणच आहे. रमाबाईंच्या साथीला पार्वतीबाई, नानासाहेब आहेतच पण गोपिकाबाईंसोबतच आता त्यांना माधवरावांचे देखील मन जिंकायचे आहे. या प्रवासामध्ये अनेक आव्हानांना त्यांना सामोरी जावे लागले, आणि अजूनही जावं लागत आहे.

त्यांच्यासमोर आलेल्या अनेक कठीण प्रसंगांमधून आजवर रमाबाई नेहमीच बाहेर पडल्या. माधवरावांचा अबोला, गोपिकाबाईंची नाराजी आणि आनंदीबाईंची कट कारस्थान ज्याविषयी रमाबाई अनभिज्ञ आहेत, पण कधी पार्वतीबाई तर कधी सावित्रीबाईंच्या मदतीने रमाबाईंनी यातून मार्ग काढण्याचा सतत प्रयत्न केला. यामध्येच आता रमाबाईंची सगळयात मोठी कसोटी लागणार आहे.

माधवरावांवर अचानक हल्ला होणार असून रमाबाई माधवरावांना कसं वाचवू शकतील, त्या सौभाग्याचं रक्षण कसं करतील हे मालिकेतील पुढील भागात पाहायला मिळणार आहे. ‘स्वामिनी’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होते.