बिग बॉस १० मधील स्पर्धक आणि क्रिकेटर युवराज सिंगची वहिनी आकांक्षा शर्मा रविवारी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. त्यावेळी तिने भारताचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग ड्रग्स घेत असल्याचे सांगितले.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आकांक्षाने एक मुलाखत दिली. त्यात तिने युवराजला ड्रग्स घेण्याची सवय असल्याचे सांगितले. तसेच, युवराजच्या आईने केलेल्या आरोपांविषयी तिला विचारले असता, आरोपांचा विषय येतो तिथे माझ्या कुटुंबालाही सोडण्यात आलेले नाही. मी माझ्या नव-यासह ड्रग्स घ्यायचे. तेव्हा युवराजनेच मला त्यालाही ड्रग्स घेण्याची सवय असल्याचे सांगितले. इंडस्ट्रीमध्ये ड्रग्स घेणे ही सामान्य बाब आहे. स्वतःच्या बचावाकरिता माझ्या सासूबाई काहीही बोलत आहेत, असे आकांक्षाने मुलाखतीत म्हटले. आपल्या असफल वैवाहिक आयुष्याविषयी बोलताना आकांक्षा म्हणाली की, आमचा विवाह केवळ कागदोपत्री झाला होता. त्या नात्यात काहीच नव्हते. मी काहीच खोटं सांगितल नसून, मी काय बोलले आहे ते मला माहित आहे. माझ्या वक्तव्यावरून मी मागे हटत नाहीए. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्याबाबत आता काहीही बोलणे योग्य राहणार नाही.

यावेळी आकांक्षाने नकळत आपल्या असफल लग्नाचा ठपका सासू शबनम यांच्यावर लावला होता. ती म्हणालेली की, माझी सासू मला वाईट वर्तणूक द्यायची. त्यावर आपली बाजू मांडत शबनम सिंह म्हणालेल्या की, र्वप्रथम हे आकांक्षाचे या प्रकरणावर बोलणे योग्य नाही, तिला या विषयावर बोलण्याची परवानगी नाही. कारण, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मी याप्रकरणी एक खास याचिका दाखल केली आहे. याची सर्वांनाच माहिती असून सर्वचजण याबद्दलचा अजेंडा समजू शकतात. आम्हाला या प्रकरणी बोलण्याची परवानगी नाही.

२०१४ मध्ये आकांक्षाचे युवीच्या भावासोबत लग्न झाले होते. एका प्रसिद्ध कुटुंबामध्ये विवाह झाल्यामुळे आकांक्षाच्या मित्रपरिवारामध्ये आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते. पण, तिच्या बाबतीच मात्र याउलटच घडले. एका प्रतिष्ठित कुटुंबामध्ये विवाहबद्ध झालेल्या आकांक्षाला जोरावरमध्ये एक चांगला पतीही नाही गवसला आणि चांगला मित्रही. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांमध्येच तिला जगण्यापेक्षा मरण्याचा मार्ग जास्त सोपा वाटू लागला. आकांक्षावर एक वेळ तर अशीही आली होती, जेव्हा तिला घर सोडून पळून जावेसे वाटत होते. पण कोणताही चुकीचा निर्णय न घेता आकांक्षाने या नात्यातून स्वत:ला वेगळे करत एकटे जगण्याचा निर्णय घेतला. ‘मला माझ्या सासरच्यांकडून काहीही नको आहे. मला फक्त जोरावरपासून घटस्फोट हवा आहे’, असे आकांक्षा म्हणाली होती.