शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही. त्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरल्याचं दिसत आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहे. या आमदारांना रात्रीच चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे एअर लिफ्ट करण्यात आलं. एकीकडे राज्यात राजकीय घटनांना जोर आलेला असताना दुसरीकडे यावर अनेकजण प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच एका मराठी अभिनेत्याने याबाबत एक ट्विट केले आहे. अभिनेता आरोह वेलणकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. राज्यातील राजकीय घडामोडींवर त्याने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. यावर आरोहने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदेंच्या ट्विटला रिट्वीट करत प्रसिद्ध अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला “परत जाऊ नका…”

“महाराष्ट्राचे एकूण ५० आमदार हे सध्या आसाममधील गुवाहाटी इथे उपस्थित आहेत. “महाविकासआघाडीची वेळ संपत आलीय, असे मला वाटतं आहे. चला पाहू पुढे काय होतंय?” असे ट्विट आरोह वेलणकरने केले आहे. त्याच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच काहींनी आरोहला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

दरम्यान शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे सुरतहून गुवाहाटीला पोहोचले आहेत. आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यात शिवसेनेचे ३३ आमदार असून सात अपक्ष आमदारांचा समावेश आहे. काल सायंकाळी शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंदरम्यान चर्चा झाली. मात्र त्यानंतरही मध्यरात्री एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसोबत गुवहाटीला गेल्याने ही चर्चा फिस्कटल्याचं सांगितलं जात आहे.