तामिळ अभिनेता सिद्धार्थचा ‘चिठ्ठा’ नावाचा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट डब करून कर्नाटकमध्येही प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने सिद्धार्थ बंगळुरूमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता. पण काही कन्नड समर्थक आंदोलक घोषणाबाजी करत कार्यक्रमस्थळी पोहोचले व त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर सिद्धार्थला पत्रकार परिषद अर्ध्यात सोडावी लागली.

“गणपतीसमोर उड्या मारताना…”, निळू फुलेंच्या मुलीची ज्येष्ठ कलाकारांबद्दल पोस्ट; म्हणाली, “हे वेडेचाळे…”

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
article about veteran film critic and author aruna vasudev
व्यक्तिवेध : अरुणा वासुदेव
vasai Bahujan vikas aghadi marathi news
वसई: भाजप कार्यकर्त्याला मारहाण, बविआच्या दोघांना अटक
Mammootty breaks silence
Mammootty : “चित्रपट म्हणजे समाजाचं प्रतिबिंब, त्यात..” ; हेमा समितीच्या अहवालावर अभिनेते मामुट्टींनी सोडलं मौन
Remembering iconic talk show host Phil Donahue
व्यक्तिवेध : फिल डॉनाह्यू
actress kangana ranaut praises indira gandhi during promotion of upcoming hindi film emergency
इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत
Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा

कावेरी नदीच्या पाण्यावरून कर्नाटक व तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये वातावरण तापलं आहे. याच दरम्यान हा प्रमोशन कार्यक्रम आयोजित करणं बरोबर नसल्याचं कर्नाटकमधील आंदोलक म्हणाले आणि अभिनेत्याला तिथून जाण्यास सांगितलं. आंदोलकांनी तिथे बराच वेळ गोंधळ घातला. त्यानंतर सिद्धार्थ मंचावर काही मिनिटं बसला होता. पण परिस्थिती बिघडल्याने तो पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून चित्रपटगृहातून बाहेर पडला.

सिद्धार्थने अद्याप बंगळुरूमध्ये घडलेल्या या प्रकारावर कोणतेही भाष्य केलेले नाही. तो सोशल मीडियावर त्याच्या चित्रपटाचे रिव्ह्यू शेअर करत आहे. पण चाहते मात्र या प्रकारामुळे नाराज झाल्याचं दिसत आहे. “दोन्ही राज्यात काही समस्या असू शकतात, पण अशा राजकीय मुद्द्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यत्यय आणणे आणि त्याला पत्रकार परिषद सोडण्यास भाग पाडणे खूप वाईट आहे,” असं एका चाहत्याने लिहिलं.

नेमका वाद काय?

कावेरी नदीचा पाणीवाटप प्रश्न जवळपास १३० वर्षं जुना आहे. कावेरी नदीचं पाणी आपल्या राज्यांमध्येही सोडलं जावं, यासाठी तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरीकडून मागणी केली जात आहे. कर्नाटकला पुरेल एवढं पाणी कावेरीत नसताना ते इतर राज्यांना कसं द्यावं? असा मुद्दा कर्नाटककडून उपस्थित केला जात आहे. पाणीवाटपावर आतापर्यंत अनेकदा तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले पण त्यात यश आले नाही. सध्या दोन्ही राज्यातील वातावरण तापलं असून तिथले शेतकरी आंदोलन करत आहेत.