बॉलिवूडमधील एखादा वाद असो वा राजकीय मुद्दा अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) याबाबत खुलेपणाने बोलताना दिसते. तिची काही वादग्रस्त विधानं चर्चेचा विषय ठरत असताच. नुकताच तिचा ‘जहाँ चार यार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटाच्यानिमित्त स्वराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ‘बॉयकॉट’ या ट्रेंडबाबत भाष्य केलं. तसेच बॉलिवूडला या ट्रेंडचा सामना का करावा लागतो? याबाबत तिने सांगितलं.

आणखी वाचा – “जर मी तुम्हाला आवडत नसेल तर…” ट्रोलर्सला आलिया भट्टचं सडेतोड उत्तर, अभिनेत्रीचा राग अनावर

transgender marathi actor Pranit Hatte got married
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
mamta kulkarni first post after being expelled from kinnar akhara
किन्नर आखाड्यातून हकालपट्टी झाल्यावर ममता कुलकर्णीने केली पहिली पोस्ट
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
anshuman vichare enters in star pravah serial
Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेला ‘हा’ अभिनेता ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत येणार! प्रोमोत दिसली झलक
3g a killer connection kissing scenes
तब्बल ३० किसिंग सीन, बोल्ड दृश्यांचा भडीमार असलेला फ्लॉप बॉलीवूड चित्रपट, कमावलेले फक्त…
फसक्लास मनोरंजन
Hemangi Sakahi And Mamta Kulkarni
ममता कुलकर्णीच्या किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पदावरून वाद; किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी यांचे संतप्त सवाल

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वराने बॉलिवूड चित्रपटांना प्रतिसाद का मिळत नाही? याची काही कारणं सांगितली. ती म्हणाली, “करोना काळानंतर लोकांनाच घराबाहेर पडायचं नाही. त्यामध्ये ओटीटीचं प्रमाण वाढलं. यामुळे चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहणंही कमी झालं. तसेच सुशांत सिंह राजपूतच्या दुर्देवी आत्महत्येनंतर बॉलिवूडचं एक वेगळंच चित्र निर्माण झालं. ड्रग्ज, दारू आणि सेक्स म्हणजे बॉलिवूड अशी प्रतिमा तयार झाली. माझा प्रश्न हा आहे की, जर या तीन गोष्टी सगळे जण कर असतील तर मग चित्रपट कोण तयार करतं?”

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडचं चित्रच बदललं असल्याचं स्वरा भास्करचं म्हणणं आहे. तसेच स्वरा म्हणाली, “देश आर्थिक मंदीचा सामना करत आहे. अशावेळी चित्रपट पाहण्यासाठी लोक पैसे खर्च करू इच्छित नाही असं अनुराग कश्यप यांचं मत आहे. त्याला मी पाठिबा देते.” स्वराने बॉलिवूड दोषी नसल्याचंही यावेळी स्पष्टपणे सांगितलं.

आणखी वाचा – Video : पारंपरिक साडी, केसात गजरा, मराठमोळा थाट अन्…; पंकजा मुंडे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत, पाहा व्हिडीओ

ती म्हणाली, “देशाच्या आर्थिक मंदीबाबत कोणीही बोलत नाही. सगळेच जण बॉलिवूडला दोष देतात. लोक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये येत नाहीत यासाठी बॉलिवूड जबाबदार आहे असं बोललं जात असेल तर हे पूर्ण खोटं आहे.” सध्या बॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. पण स्वराच्या या आगामी चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का? हे पाहणं रंजक ठरेल.

Story img Loader