बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे आज सगळं काही आहे. पण त्यांच्यावर अशी वेळ देखील आली होती, जेव्हा त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. हा तो काळ होता जेव्हा अमिताभ यांच्यावर आर्थिक संकट आलं होतं. याचा खुलासा अमिताभ यांचा मुलगा आणि अभिनेता अमिताभ बच्चनने एका मुलाखतीत केला आहे.

अभिषेकने ‘द रणवीर शो’ पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अभिषेकने त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकाटा विषयी सांगितले. अमिताभ यांनी त्यांच्याइथे काम करणाऱ्या लोकांकडून उधारीवर पैसे घेतले होते जेणे करून त्यांच्या कुटुंबाला जेवण मिळेल. “कुटुंबाच्या आजुबाजुला रहायला मला आवडतं. माझ्या वडिलांना रात्रीचे जेवण कसे मिळेल हे माहित नसताना, मी बोस्टनमध्ये राहू शकत नव्हतो. माझ्या वडिलांना आमच्या इथे कामाला असणाऱ्या लोकांकडून पैसे उधारीवर घ्यावे लागत होते, जेणे करून ते आम्हाला जेवण देऊ शकतील. त्यामुळे बोस्टनमध्ये न राहता त्यांच्या जवळ राहण्याची गरज आहे असे मला वाटले,” असे अभिषेक म्हणाला.

Flight Rule Of Handbags Indigo Scales Questioned By Passenger After Same Bag Weighs 2 Kg Differently video
“पैसे उकळण्यासाठी काहीही” विमानतळावर होतेय प्रवाशांच्या बॅगांची फसवणूक? VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”
Bike Rider Teach Lesson To Bus Driver
‘म्हणून शिक्षण महत्वाचे…’ रस्त्याच्या मधोमध थांबून त्याने बस चालकाला घडवली अद्दल; हाताची घडी घातली अन्… पाहा VIDEO चा शेवट
Mohandas Pai
“सीईओंना ५० कोटी रुपये पगार देता पण…”, इन्फोसिसचे माजी अधिकारी म्हणाले, “आयटी इंडस्ट्रीमध्ये फ्रेशर्सचे शोषण”
young bachelors planning to make chicken
Video : चिकनचा बेत आखला अन् ऐनवेळी गॅस गेला, तरुणांनी केला भन्नाट असा जुगाड
Viral video of Biker got stuck between two buses while overtaking stunt goes wrong
काय गरज होती? ओव्हरटेक करायला गेला अन् दोन बसच्या मधोमधच अडकला, VIDEO पाहून कपाळावर माराल हात
crop insurance scam loksatta news
बडे राजकारणी + विमा कंपन्या = पीक विमा घोटाळा

पुढे अभिषेक म्हणाला, त्याने अमिताभ यांना फोन केला आणि कॉलेज सोडून त्यांच्यासोबत राहण्याची इच्छा सांगितली. हे ऐकल्यानंतर अमिताभ भावूक झाले होते. त्याआधीच अभिषेकने अमिताभ यांना त्याला अभिनेता होण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अभिषेक भारतात परतला.

नुकतेच केबीसीचे १ हजार एपिसोड पूर्ण झाले आहेत. त्यावेळी अमिताभ हे भावूक झाले आणि त्यांनी केबीसीची ऑफर कशी स्विकारली ते सांगितले होते. केबीसीची ऑफस जेव्हा त्यांना मिळाली होती तेव्हा त्यांच्यावर आर्थिक संकट आले होते. त्यांना चित्रपटसृष्टीत काम मिळत नव्हते. या कारणामुळे त्यांनी केबीसी करण्यासाठी होकार दिला होता.

Story img Loader