आजचा प्रेक्षक हा प्रगल्भ आहे. त्याला वास्तवाचे भान आहे, त्यामुळे प्रेक्षकाला तेच वास्तव पाहणे अधिक आवडते. या छोटय़ा मात्र महत्त्वाच्या मुद्दय़ाला धरून सुरुवात केलेल्या ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘बन मस्का’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ‘मैत्रेयी’ आणि ‘सौमित्र’ या दोन पात्रांच्या मैत्रीपासून सुरू झालेल्या या मालिकेने अवघ्या दहा महिन्यांत प्रेक्षकांना आपलेसे केले. सध्याच्या रटाळ मालिकांना छेद देणारे संवाद, विषयाची मांडणी आणि सहजता ‘बन मस्का’च्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पोतडी एंटरटेनमेंट’ या नव्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून दिग्दर्शक विनोद लव्हेकर, निखिल शेठ आणि अभिनेता, दिग्दर्शक संदेश कुलकर्णी या तिकडीने आणलेले ‘बन मस्का’ हे पहिले पुष्प. यापूर्वीही या तिघांनी थिएटरमध्ये नवनवे प्रयोग करून प्रेक्षकांना अचंबित केले आहे. त्यामुळे मालिका करतानाही तोचतोचपणा आणण्यापेक्षा काहीतरी नवे करावे असा या तिघांचा प्रयत्न होता. त्यातून गप्पांच्या ओघातच मालिकेचा विषय ठरला आणि त्याची कथाही तयार झाली, असे संदेश कुलकर्णी यांनी सांगितले. साधारणपणे मालिका या टीआरपीनुसार ठरविल्या जातात. प्रेक्षकांना काय आवडते यानुसार मालिकांचे कथानक वाढविले जाते. मात्र या तुलनेत ‘बन मस्का’ हा प्रयोग नवा ठरतो. ‘बन मस्का’ सुरू होण्यापूर्वीच त्याचे दहा महिन्यांचे संपूर्ण कथानक तयार होते. या मालिकेतील संवाद लिहिण्याची जबाबदारी विनोद लव्हेकर, मनस्विनी लता रवींद्र, संदेश कुलकर्णी यांच्याकडे होती. या संवादातही मालिकेतील पात्रांच्या गरजेप्रमाणे खुसखुशीतपणा आणण्यात आला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about bun maska serial of zee yuva
First published on: 04-06-2017 at 02:55 IST