सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांच्या खासगी आयुष्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आशिष विद्यार्थी यांनी २५ मे रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी राजोशी बरुआ (पिलू विद्यार्थी) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. यामुळे नेटकऱ्यांनी आशिष विद्यार्थींनी पहिल्या पत्नीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली यावर आता राजोशी बरुआ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा : दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामवरील नावात केला मोठा बदल…जाणून घ्या कारण

Genelia and Riteish Deshmukh 13th Marriage Anniversary
लग्नाला १३ वर्षे पूर्ण होताच जिनिलीया देशमुखने दिली ‘या’ गोष्टीची कबुली! रितेशसह फोटो शेअर करत म्हणाली, “तू एकमेव…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
transgender marathi actor Pranit Hatte got married
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
Lady professor marries student west bengal
Video: महिला प्राध्यापिकेचं वर्गातच विद्यार्थ्याशी झालं लग्न; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर म्हणाल्या, “हा तर…”
Woman to High Court for seeking abortion due to marital dispute
वैवाहिक कलहामुळे महिलेची गर्भपाताच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding actress reacts on trolling
“पियुष माणूस म्हणून कोणापर्यंतच पोहोचलेला नाही” लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलली सुरुची अडारकर; म्हणाली, “त्याचा भूतकाळ हा…”
2 women marry each other
नवऱ्याचा छळ आणि व्यसनाधीनतेला कंटाळून, दोन महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ
karan veer mehra second wife got married
करण वीर मेहराच्या दुसऱ्या बायकोने केलं लग्न, अभिनेत्रीने मंदिरात बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

राजोशी बरुआ यांनी ‘हिंदुस्थान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आशिष विद्यार्थी यांनी त्यांची कधीही फसवणूक केली नाही, ते दोघेही दोन वर्षांपूर्वी वेगळे झाले आहेत. राजोशी म्हणाल्या, “आम्ही दोघे २०२१ मध्येच वेगळे झालो होतो आणि गेल्या वर्षी घटस्फोट झाला. आशिषला घटस्फोटाबाबत सोशल मीडियावर कोणालाही सांगावे असे वाटले नाही. विभक्त झाल्यानंतरही आम्ही दोघे मित्र आहोत. आमच्या लग्नाची २२ वर्षे म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ होता. आम्ही दोघांनी एकत्र प्रवास केला, आमच्या अनेक आवडीनिवडी सारख्या होत्या, आमच्यात भांडण कधीच झाले नाही तसेच आम्हाला एक मुलगा सुद्धा आहे.”

हेही वाचा : आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचं मराठी ऐकलंत का? ‘पानी फाउंडेशन’चा कार्यक्रम पाहून नेटकरी म्हणतात “किरण मॅडम…”

राजोशी पुढे म्हणाल्या, “आम्हाला दोघांनाही आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी हव्या होत्या. यादरम्यान माझा कोणीही छळ केला नाही, गेल्या दोन वर्षांत आम्ही दोघेही आपल्या वाटेने जात आता चांगले आयुष्य जगत आहोत. सोशल मीडियावर केवळ अफवा सुरु असून आशिषने कधीही माझी फसवणूक केली नाही.”

दरम्यान, आशिष विद्यार्थी यांनीही दुसरे लग्न का केले याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, “आयुष्यात मी एकट्याने राहून पाहिले परंतु मला जोडीदाराबरोबर राहण्यास खूप आवडते. मागच्या वर्षी मी रुपाली बरुआ यांना भेटलो आणि आम्ही लग्न केले. रुपाली ५० वर्षांची असून मी ६० नाही तर ५७ वर्षांचा आहे. माझ्या आयुष्यात जे झाले ते कोणाच्याही आयुष्यात होऊ शकते म्हणून कायम दुसऱ्यांचा सन्मान करा आणि इतरांचा आदर करा.”

Story img Loader