गेल्या काही महिन्यांपासून देशात सुरु असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मनोरंजन क्षेत्रामध्ये अनेक चढउतार सुरु आहेत. अनेक नियमांच्या बंधनामध्ये मालिकांची शुटिंग सुरु तर झालीत पण तरीही अजूनही वातावरण सर्वसामान्य व्हायला वेळ लागेलच. अशा वेळेला प्रेक्षकांना जोडून ठेवण्यासाठी अनेक वाहिन्या जुन्या, लोकप्रिय मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात करतायेत. त्यामुळे सर्वांची आवडती ‘अवघाचि संसार’ ही मालिका देखील पुन्हा सुरु होणार आहे.

झी युवा वाहिनीने आता लोकप्रिय मालिका अवघाचि हा संसार पुन्हा एकदा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी ‘जुळून येती रेशीमगाठी’ आणि ‘वहिनीसाहेब’ या दोन लोकप्रिय मालिका पुन्हा सुरु केल्या होत्या.

Prof Narhar Kurundkar contributions in the field of literature
प्रा. नरहर कुरुंदकर गुरुजींना आठवताना…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
France ai summit loksatta news
फ्रान्समध्ये आजपासून ‘एआय’ शिखर परिषद
Satvya Mulichi Satvi Mulgi
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; कधी व कुठे पाहायला मिळणार? जाणून घ्या…
Premachi Goshta serial time change after tejashri Pradhan exit
तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर घसरला टीआरपी अन् आता झाला मोठा बदल, नेमकं काय घडलंय? वाचा…
Paaru
Video: लग्नातून गायब झालेला हरीश मालिकेत पुन्हा परतणार; पारूचे सत्य सर्वांसमोर येणार का?
adinath kothare
आदिनाथ कोठारे नव्या भूमिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; फोटो पोस्ट करत सांगितलं चित्रपटाचं नाव
Amravati konkan special train
गडकिल्ले बघायचेय? मग ६ फेब्रुवारीला तयार रहा; अमरावतीहून विशेष…

२००६मध्ये प्रदर्शित झालेल्या अवघाचि संसार मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचबरोबर मालिका त्यावेळी अतिशय लोकप्रिय ठरली होती. अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेता प्रसाद ओक यांच्या या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका होत्या. अमृताने यात आसावरी नावाच्या एका साध्या सरळ गावातल्या मुलीची भुमिका साकारली होती. आपल्या तत्वांशी प्रामाणिकअसणारी कर्तव्यनिष्ठ अशा आसावरीचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केलं होतं. आता ही मालिका २४ ऑगस्टपासून दुपारी ४ वाजता झी युवावर पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader