मराठी रंगभूमीवर सध्याच्या घडीला हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नाटकं चांगली सुरु आहेत. बालनाटय़ांचीही काही वेगळी परिस्थिती नसते. बाल रंगभूमीचा विचार करता आपल्या मुलाने फक्त नाटकात काम करावे, एवढीच मनिषा बाळगून पालक तिथली वाट धरतात. मात्र नाटकांत काम करणाऱ्या या मुलांच्या पालकोंशिवाय बालरंगभूमीला प्रेक्षकच नाही असं विदारक दृश्य आहे. महाराष्ट्राचं हे चित्र मग अन्य राज्यांत काय चित्र असेल? याची कल्पनाच करायला नको, असं तुम्हाला वाटेल. पण तसं नक्कीच नाही. जवळपास पाच लाख मराठी भाषिकांचं इंदूर याला अपवाद ठरलं आहे. ‘मुक्त संवाद’ ही संस्था गेल्या बारा वर्षांपासून इंदूरमध्ये मराठी भाषा, आपली संस्कृती आणि साहित्याचे संवर्धन करण्याचे काम करते आहे. पण फक्त चर्चासत्र घेण्यापर्यंत ही संस्था मर्यादित राहिलेली नाही. आपली पुढली पिढी इंग्रजी माध्यमात भले शिकत असेल पण त्यांना मराठी भाषेचीही गोडी हवी, हे मनाशी निश्चित करत या संस्थेने सात वर्षांपूर्वी बालनाटय़ महोत्सवाचे आयोजन करायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच झालेल्या बालनाटय़ महोत्सवात तब्बल ४१ बालनाटय़ सादर करण्यात आली, हे ऐकल्यावर बऱ्याचजणांना धक्का बसेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा