जगभरातील दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांसमोर आणणारा महोत्सव म्हणजे ‘कान.’ हा महोत्सव वेगवेगळ्या कारणाने कायम चर्चेत असतो. कानसाठी जगभरातून निवडले जाणारे चित्रपट, बॉलिवूडमधून कानवारी करणारे चित्रपट, सरकारी कृपेने का होईना कान महोत्सवाला हजेरी लावणारे मराठी चित्रपट आणि कानच्या रेड कार्पेटवर झळकणारे आपले देशी सितारे अशी कितीतरी धामधूम या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने होत असते. आता या महोत्सवात ‘भारत माझा देश आहे’ हा मराठी चित्रपट दाखवला जाणार आहे. पांडुरंग कृष्णा जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा प्रीमियर ८ जुलै रोजी महोत्सवात होणार आहे.

सैनिकी परंपरा असलेल्या गावाच्या पार्श्वभूमीवरील एक हृदयस्पर्शी कथा ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटात मांडण्यात आली आहे. पांडुरंग कृष्णा जाधव यांनी आतापर्यंत केलेल्या चित्रपटांतून स्वतःचा ठसा उमटवला आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या “मनातल्या उन्हात”, “ड्राय डे” या चित्रपटांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसन्मान प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या अनुभवी दिग्दर्शकानं आता अतिशय हळुवार आणि भावनिक कथेची मांडणी “भारत माझा देश आहे” या चित्रपटातून केली आहे.

Indias got latent
Indias Got Latent : विचित्र कलांचं प्रदर्शन ते अनोखा स्कोअरिंग फॉरमॅट; इंडियाज गॉट लेटेंट कार्यक्रमाचं नेमकं स्वरुप काय?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
chhaava new song aaya re toofan release now marathi singer vaishali samant
मुघलांशी संघर्ष ते सिंहाचा जबडा फाडला…; ‘छावा’च्या नव्या गाण्याला मराठमोळ्या गायिकेचा आवाज; अंगावर येईल काटा, सर्वत्र होतंय कौतुक
Ed Sheeran And AR Rahman Mshup
एड शीरन आणि एआर रहमान एकाच मंचावर; चेन्नई कॉन्सर्टमध्ये गायली ‘ही’ लोकप्रिय गाणी; व्हिडीओ तुफान व्हायरल
Screen News
Loveyapa सिनेमातली जोडी खुशी कपूर आणि जुनैद खान लाइव्ह, पाहा खास मुलाखत
tharla tar mag sayali and arjun express love for each other
ठरलं तर मग! अर्जुनने पहिल्यांदाच वाजवली बासरी, सायलीने गायलं गाणं! गुडघ्यावर बसून स्वीकारणार लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट, पाहा प्रोमो
Mahakavi Kalidas Natya Mandir Theatre reserved for parking lot
वाहनतळासाठी नाट्यगृह आरक्षित; महाकवी कालिदास नाट्यमंदिरातील प्रकार
Jaipur Literature Festival Books Literature Culture
जयपूर साहित्य महोत्सव: नकली श्रीमंती नव्हे… अस्सल समृद्धी

दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणाले, की आतापर्यंत विविध महोत्सवांमध्ये या चित्रपटाची निवड झाली आहे. आता “कान”(मारशे डू) चित्रपट महोत्सवासारख्या प्रतिष्ठेच्या महोत्सवातील प्रदर्शनामुळे या चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाची पटकथा निशांत धापसे यांनी लिहिली आहे तर नागराज दिवाकर यांनी छायांकन, निलेश गावंड यांनी संकलन, समीर सामंत यांनी गीतलेखन, आश्विन श्रीनिवासन यांनी संगीत, गंगाधर सिनगारे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात शशांक शेंडे, मंगेश देसाई, छाया कदम, हेमांगी कवी, राजरवीसिंहराजे गायकवाड, देवांशी सामंत, नम्रता साळोखे अशी उत्तम स्टारकास्ट आहे.

Story img Loader