बॉलिवूडमध्ये दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीला एक अशी अभिनेत्री म्हणून लक्षात ठेवले जाते की जिने ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि अदांनी सर्वांनाच घायाळ केले होते. २५ फेब्रुवारी १९७४ मध्ये मुंबईत दिव्याचा जन्म झाला. साधारणतः १९९० मध्ये दिव्याने तिच्या सिनेकरिअरची सुरुवात ‘बोबली राजा’ या तेलगु सिनेमाने केली.

२ वर्षांनी तिने आपली नजर बॉलिवूडकडे वळवली. १९९२ मध्ये तिचा ‘विश्वात्मा’ हा पहिला हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमातले ‘सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गयी’ हे गाणे फार प्रसिद्ध झाले होते. हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे.

Gadchiroli crime news husband Electric shock sleeping wife
गडचिरोली : खळबळजनक! झोपलेल्या पत्नीला दिला विजेचा ‘शॉक’…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Lucky Ali
६६ वर्षीय प्रसिद्ध गायक चौथ्यांदा लग्न करणार? म्हणाला, “मला पुन्हा…”
Crime News
Crime News : HIV पॉझिटिव्ह व्यक्तीकडून १७ वर्षीय मुलीचे अपहरण, १० महिने लैंगिक शोषण; इतके दिवस ‘असा’ राहिला फरार
Jeet Adani Diva Shah Marriage
Jeet Adani : विवाहापूर्वी गौतम अदाणींच्या मुलाची ‘मंगल सेवा’, दिव्यांग भगिनींसाठी केली इतक्या लाखांची तरतूद
Genelia and Riteish Deshmukh 13th Marriage Anniversary
लग्नाला १३ वर्षे पूर्ण होताच जिनिलीया देशमुखने दिली ‘या’ गोष्टीची कबुली! रितेशसह फोटो शेअर करत म्हणाली, “तू एकमेव…”
Gangasagar, who is now a 65-year-old ‘Aghori’ known as Baba Rajkumar
आश्चर्यच! २७ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला व्यक्ती महाकुंभमेळ्यात भेटला, पण…; कुटुंबाने केली डीएनए चाचणीची मागणी!
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”

१९९२ मध्ये दिव्याचा ‘शोला और शबनम’, ‘दिल का क्या कसूर दीवाना’, ‘बलवान’, ‘दिल आश्ना है’ यांसारखे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले होते. ‘दीवाना’ या सिनेमासाठी दिव्याला फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. १९९२ ते १९९३ या एका वर्षात दिव्याने १४ हिंदी सिनेमांत काम केले. एखाद्या नवोदित कलाकाराने पदार्पणाच्याच वर्षी १४ सिनेमात काम करण्याचा रेकॉर्ड आजही दिव्या भारतीच्याच नावावर आहे.

divya-2

divya-3

‘शोला और शबनम’ या सिनेमाच्या सेटवर फिल्ममेकर साजिद नाडियाडवाला गोविंदाला भेटायला गेले होते. तेव्हा त्यांची ओळख दिव्या भारतीशी झाली. त्यानंतर दिव्या १९९२ मध्ये साजिद नाडियाडवालासोबत विवाह बंधनात अडकली. तेव्हा दिव्या भारती केवळ १८ वर्षांची होती. पण लग्नाच्या केवळ एक वर्षांनंतर ५ एप्रिल १९९३ मध्ये दिव्याचा राहत्या घराच्या पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यु झाला. दिव्याच्या मृत्यूनंतर तिचे ‘रंग’ आणि ‘शतरंज’ हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. ‘रंग’ हा सिनेमा तेव्हाच्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट सिनेमा ठरला होता.

Story img Loader