गुलजार, मणीरत्नम आणि ए आर रेहमान या त्रिकूटाने बरेच सुपरहीट चित्रपट दिले आहेत. यावर्षी या तिघांनी केलेल्या ‘दिल से’ या चित्रपटालाही ३० वर्षं पूर्ण होणार आहेत. नुकतंच या तिघांनी ‘पोन्नियिन सेल्वन २’ या चित्रपटासाठीही काम केलं. या चित्रपटात गुलजार यांनी लिहिलेलं ‘रूंआ रूंआ’ हे गाणं सध्या चांगलंच गाजत आहे. एकूणच ही तीन मातब्बर मंडळी जेव्हा एखाद्या कलाकृतीसाठी एकत्र येतात तेव्हा ती प्रेक्षकांसाठी एक वेगळीच पर्वणी ठरते.

नुकतंच ‘फिल्म कंपॅनीयन’ या युट्यूब चॅनलच्या एका मुलाखतीमध्ये या तिघांनी हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यान गुलजार, मणीरत्नम आणि एआर रेहमान यांनी त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी शेअर केल्या. या आठवणींपैकी गुलजार यांनी रेहमानबद्दलची एक खास आठवण शेअर केली.

Mahesh Landge, Wagheshwar Maharaj temple,
‘भोसरी माझी आई, तर चऱ्होली मावशी’; महेश लांडगे यांनी दोन माजी महापौरांसह ठोकला शड्डू
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Loksatta explained Why are political leaders killed Apart from politics there are other reasons behind the murder
राजकीय नेत्यांच्या हत्या का होतात? हत्येमागे अनेकदा राजकारण वगळता ‘अन्य’ कारणेच?
Ratan Tata Newspaper vendor
Ratan Tata: गरिबांचा कैवारी! रतन टाटांनी जेव्हा पेपरवाल्याला केली होती ५ लाखांची मदत, २० वर्ष घरी वर्तमान पत्र देणाऱ्याने सांगितली आठवण
aditya thackeray devendra fadnavis
“…तर इगो कुणाचा दुखावतोय, हे कळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर!
women raped in Bopdev Ghat Pune
Bopdev Ghat Crime : “तरुणाला बांधलं आणि त्यानंतर २१ वर्षांच्या तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार..”, पोलिसांनी सांगितला बोपदेव घाटातला घटनाक्रम
ajit pawar nitin gadkari ladki bahin yojana statement
“…तर आम्ही लाडकी बहीण योजना सुरुच केली नसती”; नितीन गडकरींच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”

आणखी वाचा : ‘किसी का भाई किसी की जान’ फ्लॉप ठरल्यामुळे सलमान खान घेणार ब्रेक? जाणून घ्या नेमकं कारण

अनुपमा चोप्रा यांनी ‘सदमा’ चित्रपटादरम्यान रेहमान आणि गुलजार यांची भेट झाल्याची आठवण करून देताना त्यावेळी गुलजार यांना काय वाटलं याबद्दल विचारलं. तेव्हाची नेमकी आठवण गुलजार आणि रेहमान यांना दोघांना आठवणं कठीण असल्याने त्यांना त्या भेटीबद्दल फारसं काहीच बोलता आलं नाही, पण गुलजार यांनी रेहमानबद्दल एका वेगळ्या गोष्टीचा खुलासा केला.

गुलजार म्हणाले, “मला नेमकं ती घटना आठवणं कठीण आहे पण मला एक गोष्ट चांगली आठवते ती म्हणजे जावेद अख्तर यांनी रेहमानबद्दल एक छान गोष्ट मला सांगितलेली. त्यावेळी रेहमानचे केस हे कुरळे होते. तेव्हा जावेद अख्तर म्हणाले की तो लहान मुलगा आहे तो बालक भगवान म्हणजेच भगवान श्री कृष्णासारखा दिसतो.” गुलजार यांनी ही आठवण सांगितल्यावर बाकीच्यांनीही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.