Aamir Khan Third Marriage: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान (Aamir Khan) त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार बोलत नाही. आमिरने दोन लग्नं केलीत, दोन्हीवेळा त्याचा घटस्फोट झाला. जवळपास तीन दशकं सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या आमिरने खूप सिनेमे केले. पण आता तो कामाला नाही तर कुटुंबाला प्राधान्य देतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमिरने नुकतीच रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरं दिली. त्याला तिसऱ्या लग्नाबाबत विचारण्यात आलं, त्याबाबतही त्याने प्रतिक्रिया दिली. तसेच तो अजुनही दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नी रीना दत्ता व किरण राव यांच्या खूप जवळ आहे, असंही त्याने नमूद केलं.

झहीर इक्बालशी दोन महिन्यांपूर्वी ज्या घरात लग्न केलं तेच विकतेय सोनाक्षी सिन्हा; कारण नेमकं काय? जाणून घ्या

मला जोडीदाराची गरज – आमिर खान

गेल्या काही वर्षांत लग्नसंस्था कशी बदलली आहे, याकडे रियाने लक्ष वेधले. तसेच तिने आमिरला लग्नाबाबत त्याचं मत विचारलं आणि तिने लग्न करावं का? याबद्दल सल्ला मागितला. त्यावर “माझी दोन्ही लग्नं अयशस्वी राहिली. त्यामुळे माझ्याकडून लग्नाचा सल्ला घेऊ नकोस,” असं गमतीने आमिर म्हणाला. “मला एकटं राहायला आवडत नाही, मला जोडीदाराची गरज आहे. मी एकलकोंडा नाही, मला सहवास आवडतो. मी माझ्या दोन्ही पत्नी रीना आणि किरण यांच्या खूप जवळ आहे, आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. आयुष्याचा काहीच भरवसा नाही,” असं आमिर खान म्हणाला.

बॉलीवूड अभिनेत्रीने ब्रिटिश अभिनेत्याशी केलं लग्न, पहिल्या रिलेशनशिपमधून आहे पाच वर्षांचा मुलगा

तिसऱ्या लग्नाबाबत आमिर खान म्हणाला…

रियाने आमिर खानला विचारलं की तो तिसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करत आहे का? त्यावर अभिनेता म्हणाला, “मी आता ५९ वर्षांचा आहे, त्यामुळे मला वाटत नाही आता मी पुन्हा लग्न करेन. माझ्या आयुष्यात सध्या खूप नाती आहेत, मी माझ्या कुटुंबाशी, माझ्या मुलांशी पुन्हा कनेक्ट झालोय. माझ्या जवळच्या लोकांबरोबर राहून मला खूप आनंद होतो. मी एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी प्रयत्न करत आहे. ”

एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता

दरम्यान, आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्ताशी (Reena Dutta) झाले होते. या जोडप्याने १९८६ साली लग्न केलं होतं आणि ते १६ वर्षांनी २००२ मध्ये विभक्त झाले होते. पहिल्या लग्नापासून आमिरला जुनैद खान हा मुलगा व आयरा खान ही मुलगी आहे. त्यानंतर त्याने २००५ मध्ये किरण रावशी (Kiran Rao) दुसरं लग्न केलं. या लग्नापासून त्याला आझाद नावाचा मुलगा आहे. आमिर व किरण यांचा १६ वर्षांच्या संसारानंतर २०२१ मध्ये घटस्फोट झाला. आमिरचे दोन घटस्फोट झाले असले तरी त्याच्या दोन्ही पत्नी, तो, त्याची आई सर्वजण एकाच इमारतीत राहतात. ते सर्व सण उत्सव एकत्र साजरे करतात. आमिरची लेक आयरा जानेवारी २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नासाठी आमिरच्या दोन्ही पत्नी व संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते.

आमिरने नुकतीच रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरं दिली. त्याला तिसऱ्या लग्नाबाबत विचारण्यात आलं, त्याबाबतही त्याने प्रतिक्रिया दिली. तसेच तो अजुनही दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नी रीना दत्ता व किरण राव यांच्या खूप जवळ आहे, असंही त्याने नमूद केलं.

झहीर इक्बालशी दोन महिन्यांपूर्वी ज्या घरात लग्न केलं तेच विकतेय सोनाक्षी सिन्हा; कारण नेमकं काय? जाणून घ्या

मला जोडीदाराची गरज – आमिर खान

गेल्या काही वर्षांत लग्नसंस्था कशी बदलली आहे, याकडे रियाने लक्ष वेधले. तसेच तिने आमिरला लग्नाबाबत त्याचं मत विचारलं आणि तिने लग्न करावं का? याबद्दल सल्ला मागितला. त्यावर “माझी दोन्ही लग्नं अयशस्वी राहिली. त्यामुळे माझ्याकडून लग्नाचा सल्ला घेऊ नकोस,” असं गमतीने आमिर म्हणाला. “मला एकटं राहायला आवडत नाही, मला जोडीदाराची गरज आहे. मी एकलकोंडा नाही, मला सहवास आवडतो. मी माझ्या दोन्ही पत्नी रीना आणि किरण यांच्या खूप जवळ आहे, आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. आयुष्याचा काहीच भरवसा नाही,” असं आमिर खान म्हणाला.

बॉलीवूड अभिनेत्रीने ब्रिटिश अभिनेत्याशी केलं लग्न, पहिल्या रिलेशनशिपमधून आहे पाच वर्षांचा मुलगा

तिसऱ्या लग्नाबाबत आमिर खान म्हणाला…

रियाने आमिर खानला विचारलं की तो तिसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करत आहे का? त्यावर अभिनेता म्हणाला, “मी आता ५९ वर्षांचा आहे, त्यामुळे मला वाटत नाही आता मी पुन्हा लग्न करेन. माझ्या आयुष्यात सध्या खूप नाती आहेत, मी माझ्या कुटुंबाशी, माझ्या मुलांशी पुन्हा कनेक्ट झालोय. माझ्या जवळच्या लोकांबरोबर राहून मला खूप आनंद होतो. मी एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी प्रयत्न करत आहे. ”

एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता

दरम्यान, आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्ताशी (Reena Dutta) झाले होते. या जोडप्याने १९८६ साली लग्न केलं होतं आणि ते १६ वर्षांनी २००२ मध्ये विभक्त झाले होते. पहिल्या लग्नापासून आमिरला जुनैद खान हा मुलगा व आयरा खान ही मुलगी आहे. त्यानंतर त्याने २००५ मध्ये किरण रावशी (Kiran Rao) दुसरं लग्न केलं. या लग्नापासून त्याला आझाद नावाचा मुलगा आहे. आमिर व किरण यांचा १६ वर्षांच्या संसारानंतर २०२१ मध्ये घटस्फोट झाला. आमिरचे दोन घटस्फोट झाले असले तरी त्याच्या दोन्ही पत्नी, तो, त्याची आई सर्वजण एकाच इमारतीत राहतात. ते सर्व सण उत्सव एकत्र साजरे करतात. आमिरची लेक आयरा जानेवारी २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नासाठी आमिरच्या दोन्ही पत्नी व संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते.