अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ चित्रपट शुक्रवारी (६ ऑक्टोबर रोजी) प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सरदार जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने बायोपिक करण्याबद्दल भाष्य केलं आहे. तसेच बायोपिक चित्रपट हे मसालापटांइतकी कमाई कधीच शकत नाही असं मतही त्याने मांडलं.

गोष्ट पडद्यामागची: हॉलीवूडमध्ये झळकलेल्या ‘गाईड’ चित्रपटाची गोष्ट, देव आनंद यांच्या सिनेमात वहिदा रेहमान यांची वर्णी कशी लागली?

vhp on ayan mishrea murder case
Aryan Mishra Murder : गोरक्षकांकडून आर्यन मिश्राची हत्या, हिंदुत्ववादी संघटनांनी हात झटकले; म्हणाले, “हिसांचाराचे समर्थन नाही”
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Ganpati powerful stotram and mantras
Ganesh Chaturthi 2024 : फक्त मोदक आणि दूर्वाच नाही ‘हे’ प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही आहेत बाप्पाला प्रिय; नियमित पठण केल्यास बाप्पा देईल भरपूर आशीर्वाद
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: बैलबुद्धी? नंदीबैल?
NEW BORN GIRL
“मुलीचा रंग जरा काळाच आहे ना…”; नवजात बाळाच्या रुपाचीही समाजाला चिंता!
News About Sanjoy Roy What His Mother in Law Said?
Sanjoy Roy : “संजय रॉयला फाशी दिली तरीही आम्हाला काहीच..”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या सासूची प्रतिक्रिया
Why every sister should also promise to protect her brother this Raksha Bandhan
प्रत्येक बहिणीने आपल्या भावाचे का केले पाहिजे रक्षण? लक्षात ठेवा या ६ महत्त्वाच्या गोष्टी
Ambadas Mohite, Rakshabandhan, Maharashtra, abuse-free society, gender equality, respect for women,
रक्षाबंधनाला, मी कोणालाही आई-बहिणीवरून शिव्या देणार नाही, असे वचन…

बायोपिक मसालापटांप्रमाणे कमाई करत नसले तरी त्याला हे आकडे बायोपिक बनवण्यापासून रोखत नसल्याचं अक्षय म्हणाला. “टॉयलेट एक प्रेम कथा, पॅडमॅनपूर्वी अशा विषयांवर चित्रपट बनवण्याचे धाडस कोणी केले नव्हते. जेव्हा मी टॉयलेट एक प्रेम कथा बनवली, तेव्हा सगळे मला म्हणाले, ‘तू वेडा आहेस का, हे चित्रपटाचे नाव असू शकते का? तुला टॉयलेटवर चित्रपट बनवायचा आहे, असं तू म्हणतोय?’ पण मी लोकांच्या बोलण्यामुळे थांबलो नाही, पुढे गेलो,” असं अक्षयने सांगितलं. ‘डीएनए’ने याबद्दल वृत्त दिलं आहे.

करिअरमध्ये तब्बल १८० फ्लॉप चित्रपट देऊनही ‘हा’ अभिनेता कसा बनला स्टार? एका वर्षी केलेले सलग ३३ फ्लॉप सिनेमे

यावेळी अक्षयने त्याच्या ‘पॅडमॅन’ चित्रपटाचाही उल्लेख केला. “मी सॅनिटरी पॅडवर एक फिल्म बनवली, कोणाच्या बापाची हिंमत नाही की सॅनिटरी पॅडवर चित्रपट बनवेल,” असं अक्षय कुमारने म्हटलं. अभिनेत्याने मसालापट आणि बायोपिकच्या कमाईची तुलना करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. “असे सिनेमे मोठी कमाई करत नसतील तर ते बनवणं थांबवायचं का? कुणाला तरी हे चित्रपट बनवावे लागतीलच ना. व्यावसायिक चित्रपट व सत्यकथेवर आधारित चित्रपटांच्या कमाईत फरक असणारच,” असं अक्षयने स्पष्ट केलं.

“मिशन रानीगंज हा चित्रपट किती व्यवसाय करेल, याबद्दल विचारून माझा उत्साह कमी करू नका. समाज बदलण्याची ताकद असलेले आणखी चित्रपट बनवण्याची हिंमत मला द्या,” असं अक्षय म्हणाला. दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या करिअरमध्ये ‘पॅडमॅन’, ‘केसरी’, ‘मिशन मंगल’ आणि ‘मिशन राणीगंज’ हे बायोपिक केले आहेत.