‘हेरा फेरी’ या सुपरहीट चित्रपटाच्या तिसऱ्या भागावरून सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या सीरिजचे दोन्ही भाग आजही प्रेक्षकांचे अत्यंत आवडीचे आहेत. शिवाय या सीरिजमधील परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिघांची जोडी ही प्रेक्षकांना फार आवडली. आता याच्या तिसऱ्या भागात अक्षय कुमार नसल्याची चर्चा रंगली आहे. नुकतंच अभिनेते परेश रावल यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून याची पुष्टी केली आणि त्यांनंतर सोशल मीडियावर याची चर्चा होऊ लागली आहे.

या तिसऱ्या भागात अक्षय ऐवजी कार्तिक आर्यनला दिसू शकतो अशी चर्चा सध्या होत आहे आणि यामुळे अक्षय कुमारचे आणि ‘हेरा फेरी’ या चित्रपट मालिकेचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. ‘अक्षयला परत आणा’ असा ट्रेंडसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षय ऐवजी कार्तिक आर्यन या चित्रपटात दिसणार आहे हे जवळपास नक्की झालं आहे. याबाबत ‘बॉलिवूड हंगामा’च्या स्पेशल वृत्तानुसार अक्षय या चित्रपटात न दिसण्यामागचं कारण समोर आलं आहे.

sangli islampur
चावडी: इस्लामपूरची ताकद कुणाच्या पाठीशी…
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित
batagaika creater
पृथ्वीवरील ‘गेटवे टू हेल’ म्हणून ओळखला जाणारा रहस्यमयी खड्डा काय आहे? त्याचा आकार वाढणं धोक्याचा इशारा आहे का?
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
Wolves terrorize villages in Bahraich district of Uttar Pradesh
उत्तर प्रदेशात ‘हायब्रीड’ लांडगे बनलेत नरभक्षक! कारणे काय? बळी किती? बंदोबस्त कधी?
Lancet study finds iron calcium and folate deficiency among Indians
भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?
Shani nakshtra gochar 2024 | shani nakshtra parivartan 2024 s
शनि करणार राहुच्या नक्षत्रामध्ये प्रवेश; ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब , मिळेल अपार धनलाभ

आणखी वाचा : “तो माझ्या प्रायव्हेट पार्टकडे एकटक…” आणखी एका मॉडेल अभिनेत्रीचा साजिद खानवर गंभीर आरोप

‘बॉलिवूड हंगामा’च्या सूत्रानुसार फिरोज नाडियाडवाला हे बरेच दिवस ‘हेरा फेरी ३’ वर विचार करत होते. याबद्दल ते कार्तिक आर्यन आणि अक्षय कुमार दोघांशी चर्चा करत होते. ‘भूलभुलैया २’च्या यशानंतर कार्तिक आर्यन हा फिरोज यांचा एक हुकमी एक्काच बनला असल्याचं चित्र समोर आलं आहे. या दोन्ही स्टार्सशी चर्चेदरम्यान अक्षय आणि कार्तिक यांनी मागितलेल्या मानधनात बरीच तफावत आल्याने कार्तिकची वर्णी लागल्याचं समोर येत आहे.

माहितीनुसार, अक्षय कुमारने चित्रपटासाठी तब्बल ९० कोटी एवढं मानधन आणि नफ्यातील काही हिस्सा मागितल्याचं समोर आलं आहे. तिथे कार्तिक आर्यन हा चित्रपट केवळ ३० कोटीमध्ये करण्यास तयार आहे. चित्रपटाचे इतर खर्च आणि मिळकत पाहता तब्बल ४५ कोटी वाचवण्याच्या दृष्टीने फिरोज यांनी कार्तिकला चित्रपटात घेण्याचं जवळपास नक्की केल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार स्पष्ट झालं आहे. अजूनतरी याबद्दल कोणत्याही अभिनेत्याने अधिकृत घोषणा केली नसल्याने यामागील खरं कारण समोर आलेलं नाही. ‘हेरा फेरी ३’चं दिग्दर्शन अनिस बाजमी करणार असल्याची चर्चा आहे. अजूनही या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू असल्याचंही बॉलिवूड हंगामाच्या सूत्राने स्पष्ट केलं आहे.