अमिताभ बच्चन यांना बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखलं जातं. ‘बिग बी’ यांनी ८० च्या दशकात संपूर्ण हिंदी मनोरंजन विश्वावर अधिराज्य गाजवलं. त्या काळात अमिताभ यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत होता. पण, पुढे ९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये अनेक नवनवीन कलाकारांची एन्ट्री झाली. त्यामुळे अमिताभ यांना हवेतसे चित्रपट मिळत नव्हते. १९९९ मध्ये त्यांच्या व्यावसायिक कंपनीला मोठा फटका बसला आणि ते कर्जबाजारी झाले. बँकेत एकही रुपया नव्हता अशी वेळ त्यांच्यावर आली होती. आयुष्यातील हा कठीण काळ ‘बिग बी’ यांनी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान सांगितला होता. त्यांचा हा व्हिडीओ अभिजीत चोक्शी यांनी एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. यात अमिताभ यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगाबाबत सांगत अंबानी कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.

१९९९ च्या काळात अमिताभ बच्चन यांची एबीसीएल कंपनी पूर्णपणे तोट्यात होती. कंपनीवर भलंमोठं कर्ज होतं. त्यावेळी अमिताभ यांनी आपल्यावर वेगवेगळ्या लोकांचं सुमारे ९० कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं सांगितलं होतं. ‘बिग बी’ म्हणाले होते, “वाईट काळात मी खूप काही अनुभवलं. कर्जदार आमच्या दारात यायचे, शिवीगाळ करायचे, धमक्या द्यायचे या गोष्टी मी कधीही विसरणार नाही. आमच्या प्रतीक्षा बंगल्यावर देखील जप्ती आली होती. यापेक्षा वाईट काय असू शकतं?”

anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Yograj Singh Shares Incident of His Father Said My Father Killed a Tiger Smeared its blood on my lips and Forehead
Yograj Singh: “माझ्या वडिलांनी वाघाची शिकार करून रक्त माझ्या ओठाला लावलं…”, युवीच्या बाबांनी सांगितला धक्कादायक किस्सा
donald trump kamala harris presidential debate
अग्रलेख : वीज म्हणाली…
N. R. Narayana Murthy
N. R. Narayana Murthy : “माझ्यासारखं होऊ नको”, नारायण मूर्ती यांचा विद्यार्थ्याला सल्ला; म्हणाले, “माझ्यापेक्षा…”
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
Nagpur, Tantrik, sexual assault, POCSO, bhondu baba raped 4 women, exorcism, bhondu baba, bhondu baba Sentenced to 20 Years, conviction, Dulewale Baba, Pardi Police Station,
भूतबाधेच्या नावावर आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार; भोंदूबाबाला अखेर…
Pimpri chinchwad, sexual assault, 14 year old girl, 14 Year Old Girl assault in Pimpri, Ravet Police station, Damini squad, arrest,
आईच्या प्रियकराकडून १४ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे

हेही वाचा : Pooja Sawant Birthday: ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंतचं प्राणीमय जग

रिलायन्स कंपनीच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त काही वर्षांपूर्वी पार पडलेल्या एका कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण दिवसांबद्दल सांगितलं होतं. ते म्हणाले, “जेव्हा माझ्या आर्थिक परिस्थितीबद्दल धीरूभाई अंबानी यांना समजलं तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच अनिलला माझ्याकडे पाठवलं. अनिल आणि माझी अनेक वर्षांपासून ओळख होती. तेव्हा धीरूभाईंनी अनिलला जाताना काही पैसे घेऊन जा असा निरोप दिला होता. अनिलने घरी आल्यावर मला सगळं सांगितलं…धीरुभाई तेव्हा जी पैशांची मदत करणार होते त्यामुळे माझ्या सगळ्या समस्येचं अगदी सहज निराकरण झालं असतं. त्यांची उदारता पाहून मला खूप भरून आलं, मी भावुक झालो. मी त्यांची मदत तेव्हा स्वीकारू शकलो नाही. देवाच्या कृपेने कालांतराने दिवस बदलले. मला काम मिळू लागलं आणि आम्ही सर्व कर्ज फेडलं.”

हेही वाचा : व्हॅलेंटाईन डेला साखरपुडा, तर लग्न…; प्रथमेश परबच्या अनोख्या लग्नपत्रिकेने वेधलं लक्ष

अमिताभ बच्चन यांनी या कठीण काळानंतर पुढे २००० मध्ये ‘मोहब्बतें’ चित्रपट आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या टेलिव्हिजन कार्यक्रमातून पदार्पण केलं. यानंतर एके दिवशी अमिताभ धीरूभाई अंबानींच्या घरी एका पार्टीला गेले. तेव्हा धीरूभाई त्यांच्या मित्रांसह पार्टीचा आनंद घेत होते. अमिताभ म्हणाले, “धीरूभाईंनी जेव्हा मला पाहिलं तेव्हा त्यांनी मला जवळ बोलावलं. त्यांनी मला त्यांच्याजवळ बसण्यास सांगितलं. मला सुरुवातीला काहीच समजलं नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना सांगितलं की, हा मुलगा काही महिन्यांपूर्वी अडचणीत होता पण, आज त्याच्या मेहनतीने तो पुन्हा उभा राहिलाय. आज मला त्याचा सर्वाधिक आदर आहे. त्यांचे ते शब्द माझ्यासाठी पैशांच्या मदतीपेक्षा अनेक पटीने जास्त होते.”

दरम्यान, अमिताभ यांची लोकप्रियता या कठीण काळानंतर आणखी वाढली. पुढे त्यांनी, ‘कभी खुशी कभी गम’, ‘आँखे’, ‘बागबान’, ‘खाकी’, ‘देव’, ‘लक्ष्य’, ‘वीर-झारा’, ‘बंटी और बबली’, ‘भूतनाथ’, ‘सरकार’, ‘पा’, ‘पिकू’, ‘पिंक’ अशा अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केलं.