बॉलीवूडचे कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी आपल्या चित्रपटातील भूमिकांमुळे, कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे, तर कधी मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता बॉलीवूूडमध्ये ज्यांची ओळख महानायक अशी आहे, त्यांनी लिहिलेल्या ब्लॉगमुळे ते चर्चेत आले आहेत.

काय म्हणाले अमिताभ बच्चन?

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये स्वातंत्र्यदिनादिवशी कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवल्याचे म्हटले आहे. ते लिहितात, “गेले काही दिवस स्टुडिओमध्ये खूप काम होते, व्यग्र होतो. आजचा स्वातंत्र्य दिन शांततेने व्यतीत केला. आज काही वेळ मी माझ्या कुटुंबाबरोबर चांगला घालवला. काम खूप असल्याने असा एखादा दिवसच मिळतो, जो मी माझ्या कुटुंबाबरोबर घालवू शकतो, माझ्या आरोग्यावर लक्ष देऊ शकतो, आराम करू शकतो. काही कामं राहिली असतील तर ती पूर्ण करू शकतो. सध्या स्टुडिओमध्ये खूप व्यग्र असल्याने येणाऱ्या दिवसांत मी माझे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन यामध्ये समतोल साधू शकेन, मी जे काही ठरवलं आहे ते पूर्ण करू शकेन, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.”

Hindenburg on Madhabi Puri Buch
‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांना संसदेच्या लोकलेखा समितीचे समन्स; हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी होणार?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
compromise between the producers and the censor board regarding the release of the emergency film mumbai news
‘इमर्जन्सी’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार; निर्माते- सेन्सॉर मंडळातील तडजोडीनंतर प्रकरण उच्च न्यायालयाकडून निकाली
Salil Ankola Former Indian Cricketer Mother Found Dead in Pune Flat Wound Marks Found on Neck
Salil Ankola: माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू, गळ्यांवर जखमांच्या खूणा
Vidhan Sabha Election 2024
अजित पवारांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळविण्यात अडचणी- ज्योतिषांची भविष्यवाणी
cpm polit bureau
सीताराम येचुरींच्या निधनानंतर महासचिवपदी कोणाची निवड होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत!
tirupati temple animal fat in laddoos row
चंद्राबाबू नायडूंच्या आरोपानंतरही तिरुपती मंदिरातील लाडूच्या विक्रीवर परिणाम नाही; गेल्या चार दिवसांत विकले गेले तब्बल ‘इतके’ लाडू
dr ajit ranade
कुलगुरूपदावरून हटवण्याचे प्रकरण : डॉ. अजित रानडे यांच्याबाबतच्या निर्णयाची बुधवारपर्यंत अंमलबजावणी नाही

पुढे त्यांनी प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल लिहिले आहे की, या क्षेत्रामध्ये प्रेक्षकांचे प्रेम आणि प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी दिलेले मत, केलेली टीका-टिप्पणी यामुळे कायमच त्यांच्याप्रति जबाबदारी वाढते, असे अमिताभ बच्चन आपल्या पोस्टमध्ये लिहितात.

हेही वाचा: Video: जान्हवी किल्लेकरच्या ‘त्या’ कृतीवर घरातील सदस्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मीठ-मसाला….”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक बच्चनने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत ग्रँड एन्ट्री केल्याचे पाहायला मिळाले होते; तर ऐश्वर्या रायने मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर ऐश्वर्या राय आणि बच्चन यांच्या कुटुंबात काहीतरी बिनसले असल्याचे म्हटले जात होते. मात्र, अभिषेक बच्चनने नुकतेच या अफवा असल्याचे म्हटले होते.

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ते नुकतेच ‘कल्की:२८९८ एडी’ या चित्रपटात काम करताना दिसले. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या पर्वाचे सूत्रसंचालन ते करत असल्याचे दिसत आहे.