Amitabh Bachchan talks about Mumbai Rain: अभिनेते अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मोठ्या चर्चेत असतात. कधी चित्रपट, कधी सोशल मीडियावरील पोस्ट, तर कधी कुटुंबामुळे ते सतत चर्चांचा भाग बनतात. आता नुकतेच त्यांनी जया बच्चनसाठी असे काही केले की, त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या एक्स अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. मुसळधार पावसात त्यांनी पत्नी जया बच्चन यांच्या डोक्यावर छत्री धरली आहे; तर जया बच्चन हातात लाडूचा डबा घेऊन उभ्या असलेल्या या फोटोत दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी, “रोज पाऊस पडतो, कामाच्या सेटवरदेखील!” असे म्हटले आहे.

Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Vasai, BJP leader, vadhavan port, fishermen,
वसई : वाढवण बंदराच्या विरोधात भाजप नेत्याच्या दुटप्पी भूमिकेमुळे मच्छीमारांमध्ये संभ्रम
dcm devendra fadnavis reaction on shivaji maharaj statue collapse
सोसाट्याच्या वाऱ्यांच्या वेगाचे आकलन झाले नसावे : देवेंद्र फडणवीस
loksatta analysis how political instability in bangladesh adversely affecting Indian healthcare
विश्लेषण : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा विपरीत परिणाम भारतीय आरोग्यसेवेवर का होतोय?
Family members appeal not to believe rumors about Badlapur harassment case
त्या चिमुकल्यांची तब्येत व्यवस्थित; अफवांवर विश्वास ठेवू नका, सहकाऱ्यांचे आवाहन
band turned violent in protest against atrocities on Hindus in Bangladesh tense silence in nashik after lathi charge by police
बांगलादेशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंदला हिंसक वळण; पोलिसांकडून लाठीमार, नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता
ST bus service, ST bus, ST bus maharashtra,
तोट्यातील ‘एसटी’ नफ्याच्या उंबरठ्यावर, झाले असे की…

Amitabh Bachchan पावसाबद्दल काय म्हणाले?

एका ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी काही फोटो शेअर करीत, पावसाळ्याबद्दल लिहिले होते. दिवसभर पाऊस पडतो, कामाच्या ठिकाणीसुद्धा, असे त्यांनी म्हटले होते. बिग बींनी जे फोटो शेअर केले होते, त्यामध्ये काही जण पावसाचा आनंद घेताना दिसत होते. त्याबरोबरच अभिनेत्याने पावसामुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल मुंबईत अचानक येणाऱ्या पुराबद्दल लिहिताना चिंता व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते, “कडक उन्हाळ्यानंतर येणारा पाऊस म्हणजे आशीर्वादच आहे. मात्र, शेती क्षेत्राला फायदा सोडला, तर पूर, भूस्खलन अशा विनाशकारी घटना घडतात. अशा पावसामुळे मोठं नुकसान होतं. अनेक घरं उद्ध्वस्त होता. प्रत्येक वर्षी हे घडत राहतं. अशा वेळी दु:ख वाटतं, असहाय वाटायला लागतं. जे नुकसान होतं, त्याचं वर्णन करणं कठीण आहे. मात्र सगळं काही सुव्यवस्थित व्हावं आणि सर्वांचं कल्याण व्हावं हीच प्रार्थना आहे”, असे म्हणत पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी त्यांनी चिंता व्यक्त करीत प्रार्थना केली आहे. बिग बींनी २०१८ मध्ये केरळच्या पूरग्रस्तांना मदत केली होती. ‘रेसुल पुकुट्टी फाउंडेशन’च्या माध्यमातून केरळच्या ‘सीएम डिस्ट्रेस रिलीफ फंड’ (CMDRF)मध्ये आपल्या वैयक्तिक वस्तूंसह ५१ लाखांची देणगी देऊन मदत केली होती.

अमिताभ बच्चन यांच्या कामाविषयी बोलायचे झाल्यास, नुकतेच कल्की : २८९८ एडी या चित्रपटात ते दिसले होते. या चित्रपटात त्यांनी निभावलेल्या भूमिकेचे कौतुक होताना दिसत आहे. नाग अश्विन दिग्दर्शित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. फक्त भारतातच नाही तर, संपूर्ण जगभरात या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्याने वडिलांबरोबरचा ‘तो’ सीन पाहून शर्मिला टागोर यांना मारली होती झापड; म्हणाला, “आजही जेव्हा मी…”

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी आपल्या कुटुंबासमवेत अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली होती. मात्र, ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या बच्चन या मायलेकीची जोडी त्यांच्याबरोबर न येता वेगळी आल्याने बच्चन कुटुंबात काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते.