टीव्हीवरील सारेगामपा या शोमधून संगीतकार अनु मलिक पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या शोच्या निमित्ताने त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला. हा प्रसंग त्यांच्या आईच्या निधनाबद्दल होता. जेव्हा आईचं निधन झालं तेव्हा मी लोकांचं मनोरंजन करत होतो, असं अनु मलिक म्हणाले.

२५ कोटींच्या लाच प्रकरणात समीर वानखेडेंच्या बाजुने निकाल, आर्यनला सोडण्यासाठी शाहरुख खानकडून पैसे मागितल्याचा होता आरोप

vicky kaushal increase weight and also learn horse riding
‘छावा’मध्ये कास्ट करण्याआधी दिग्दर्शकाने विकी कौशलला सांगितलेल्या ‘या’ दोन गोष्टी; म्हणाला, “मी ७ ते ८ महिने…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
chhaava director lakshman utekar reveals most emotional scene
विकीने १५ टेक घेतले, ढसाढसा रडला अन्…; ‘छावा’च्या दिग्दर्शकाने सांगितला सेटवरचा ‘तो’ प्रसंग, लक्ष्मण उतेकर म्हणाले…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
dada kondke
Video : “हाडाचा कलाकार आहे भाऊ! रडला पण डान्स नाही विसरला”; दादा कोंडके स्टाईल चिमुकल्याचा डान्स पाहून पोट धरून हसाल
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”

“मी ४७ वर्षांचा आहे आणि मी माझ्या करिअरची सुरुवात वयाच्या १४ व्या वर्षी केली होती. पण तरीही मी तितकीच मेहनत करतो. अनेकवेळा मी थकतो, पण नंतर उठून कामाला लागतो. शेवटी आयुष्य म्हणजे पुढे जाणे होय. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेचा भाग बनणे कठीण आहे, परंतु तुम्हाला ते करावंच लागेल. आजही अरिजित, सोनू निगम सारखे मोठे गायक आहेत, त्यांच्या नंतर नवे गायक येत आहेत जे चांगले काम करत आहेत, पण जे नवीन गायक येतील त्यांना खूप मेहनत करावी लागेल आणि स्पर्धेत उतरावे लागेल. ५ वर्षांपूर्वी माझ्या ‘मोह मोह के धागे’ या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार मिळाले. जरा कल्पना करा, मी ऐंशीच्या दशकापासून काम करत होतो, पण मला २०१७ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. माझ्यापेक्षा २५ वर्षांनी लहान असलेल्या व्यक्तीसमोर मला किती मेहनत करावी लागली असेल?,” असं अनु मलिक संगीताच्या क्षेत्रात कराव्या लागत असलेल्या मेहनतीबद्दल ‘नवभारत टाइम्स’शी बोलताना म्हणाले.

प्रेम विवाह करूनही पत्नीपासून वेगळे का राहतात नाना पाटेकर? कोण आहेत त्यांच्या पत्नी? वाचा

संगीतकार, गायक व परीक्षकांना अनेकदा वैयक्तिक त्रास बाजुला ठेवून काम करावं लागतं, तुम्हाला अशा परिस्थितीतून जावं लागलंय का? असा प्रश्न अनु मलिक यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, “होय, असं बरेचदा झाले आहे. पण एकदा एक अतिशय दुःखद परिस्थिती उद्भवली होती, जेव्हा माझ्या आईचे निधन झालं आणि मला शोसाठी जावं लागलं. मी घरी माझ्या पत्नी आणि मुलांशी बोललो आणि मग मी जायचं नसतानाही तो शो करायला गेलो. माझ्या आईचं निधन झालं होतं आणि मी मंचावरून लोकांचं मनोरंजन करत होतो. मी शोमध्ये माझे अश्रू लपवून हसत होतो आणि दुसरीकडे माझ्या आईवर अंतिम संस्कार केले जात होते.” दरम्यान, अनु मलिक यांच्या आईचं २५ जुलै २०२१ रोजी निधन झाले होते.

“कोविड नंतर काळ खूप बदलला आहे. आज प्रत्येकजण लढाई लढत आहे. स्पर्धा खूप वाढली आहे. कोविडने आपल्याला खूप काही शिकवले आहे. मी नवीन कलाकारांना सांगेन की त्यांच्या प्रतिभेवर विश्वास ठेवा आणि मेहनत सोडू नका,” असं अनु मलिक म्हणाले.

Story img Loader