‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला एकीकडे प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच दुसरीकडे मात्र या चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचे आदेश दिले असून तामिळनाडूमध्येही चित्रपटाचे प्रसारण रोखण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलीवूडमधील काही कलाकार चित्रपटाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. आता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे.

हेही वाचा : श्रद्धा कपूरच्या ब्रिटिश ॲक्सेंटचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “तू शक्ती कपूर यांची…”

Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
Mohanlal addresses media regarding Hema Committee report
Mohanlal on MeToo: मॉलीवूड लैंगिक शोषण प्रकरण: अभिनेते मोहनलाल यांचं मोठं विधान; “अनेक लोक यात..”
Thief arrested for stealing from Marathi director Swapna Joshi house Mumbai news
मुंबई: मराठी दिग्दर्शिकेच्या घरी चोरी करणाऱ्याला अटक
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट
actress kangana ranaut praises indira gandhi during promotion of upcoming hindi film emergency
इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी आणि तेथील शांतीपूर्ण वातावरण कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सांगितले. या विरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांनी बंदी हटविण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि आता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ट्वीट करत ‘द केरला स्टोरी’ला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा : आयुष्याचा जोडीदार म्हणून कसा मुलगा हवा? अमृता देशमुख म्हणाली, ‘हे’ गुण असतील तर…

अनुराग कश्यप हे ट्वीट करत म्हणाले, तुम्ही या चित्रपटाचे समर्थन करा किंवा नका करू, हा चित्रपट प्रोपगंडा असेल किंवा नसेल, यात काही आक्षेपार्ह असो वा नसो, त्यावर बंदी घालणे चुकीचे आहे. तसेच सुधीर मिश्रांच्या ‘अफवाह’ चित्रपटाला समर्थनार्थ अनुराग कश्यप म्हणाले, “तुम्हाला प्रोपगंडाविरोधात लढायचे असेल, तर सोशल मीडियाचा दुरुपयोग कसा केला जातो, समाजातील वातावरण कलुषित कसे होते हे जाणून घेण्यासाठी ‘अफवाह’ चित्रपट बघा, परंतु एखाद्या चित्रपटावर बंदी घालणे चुकीचे आहे.”

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर वादाला सुरुवात झाली होती. टीझर आणि ट्रेलरमध्ये दावा केल्याप्रमाणे केरळमधून ३२ हजार मुली गायब होऊन पुढे आयसिस आणि दहशतवादी संघटनांमध्ये त्यांना सहभागी करण्यात आले. या आकड्याबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केली. यानंतर निर्मात्यांनी ३२ हजारऐवजी ३ महिलांचा उल्लेख केला. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.