बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. आपल्या हटके शैलीसाठी आणि नव्या प्रतिभावान कलाकारांना काम देण्यासाठी तो ओळखला जातो. त्याच्या चित्रपटात बॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार नसले तरी चित्रपट हिट होतात. सध्या अनुराग त्याच्या आगामी ‘केनडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. अनुराग बऱ्याचदा वेगवेगळ्या वादांमुळेही चर्चेत असतो.

नुकतंच कलकत्ता येथील एका कार्यक्रमामध्ये अनुराग कश्यपने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि एकूणच त्यामुळे देशातले बदलेले वातावरण याबद्दल भाष्य केलं आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे आयोजित केलेल्या भव्य सोहळ्याला देशातील मोठमोठ्या सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. त्याबद्दलच अनुरागला विचारणा झाल्यावर त्याने यावर सडेतोड भाष्य केलं.

shahu Patole author of dalit Kitchen of maharashtra remarked bans on animal killings like cows and potentially donkeys wouldnt be surprising in future
भविष्यात पशु-पक्ष्यांच्या हत्येवरही बंदी आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे का म्हणाले लेखक शाहू पाटोळे
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Kumar Vishwas Statment About Arvind Kejriwal
Kumar Vishwas : “निर्लज्ज, आत्मकेंद्री आणि स्वार्थी माणसाबाबत..”, कुमार विश्वास यांचा केजरीवालांना टोला
Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Historic Century Reveals His Father
Yuvraj Singh Abhishek Sharma: “हे विसरू नकोस की तुला…” अभिषेक शर्माला शतकानंतरही युवराज सिंगने दिल्या सूचना, अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं काय होता मेसेज
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
Gods Guns and Missionaries The Making of Modern Hindu Identity Hindu
‘हिंदू कोण’ याचा शोध
Anjali Damania on Shashtri
Anjali Damania : “अतिशय आदरपूर्वक मला…” महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर अंजली दमानियांची प्रतिक्रिया!
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका

आणखी वाचा : ‘मै हूं ना’मधील ‘या’ भूमिकेसाठी कमल हासन यांना विचारण्यात आलं होतं; फराह खान म्हणाली, “शाहरुखच्या आग्रहास्तव…”

अनुराग म्हणाला, “२२ जानेवारीला जे काही घडलं ती एक मोठी जाहिरात होती. मलातरी किमान ते तसंच वाटलं. बातम्या सुरू असताना ज्या जाहिराती असतात अगदी तशीच ही जाहिरात होती, फक्त ही २४ तास चालणारी जाहिरात होती. मी नास्तिक आहे यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे माझा वाराणसीमध्ये जन्म झाला आहे अन् धर्माच्या नावाने केला जाणारा व्यवसाय हा मी फार जवळून पाहिला आहे. धर्म हा निंदकाचा शेवटचा उपाय आहे. जेव्हा तुमच्याकडे काहीच उरत नाही तेव्हा तुम्ही धर्माकडे वळता.”

पुढे अनुराग म्हणाला, “मी स्वतःला नास्तिक मानतो कारण लहानपणापासून मी बऱ्याच हतबल लोकांना मंदिरात जाऊन देवासमोर हात पसरताना पाहिलं आहे, जसं की देवाकडे एक रामबाण उपाय आहे ज्यामुळे त्यांच्या सर्व समस्या दूर होणार आहेत. हा सगळा प्रकार थांबवण्यासाठी कुणीही मोहीम का काढली नाही?” आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर आपले मोबाइल फोन्स आणि टॅबलेट आपण फेकून द्यायला पाहिजेत असंही अनुराग म्हणाला. तो म्हणतो, “जर आपल्याला एक क्रांति घडवून आणायची आहे तर मग आपण सगळ्यांनी आपले मोबाइल फोन्स आणि टॅबलेट नष्ट करायला हवेत, जसं स्वदेशी चळवळीदरम्यान आपण परदेशी कापडाची होळी केली होती. आज आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढा द्यायचा नाहीये तर लोकशाहीचा मुखवटा धारण केलेल्या फॅसिझमविरुद्ध आपल्याला लढायचं आहे.”

Story img Loader